शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

By अविनाश कोळी | Updated: January 3, 2025 13:11 IST

भाजप की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणार, याची चर्चा

अविनाश कोळीसांगली : विधानसभा निवडणुका होऊन महिना लोटला असून, सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदांचेही वाटप झाले. मात्र, पालकमंत्रिपदाचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याची चर्चा सध्या रंगली आहे. भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे हे पद जाणार, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद जाणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, ते कोणाला मिळणार, याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव सांगलीच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. त्याचवेळी पुण्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतही चंद्रकांत पाटील असल्याने त्यांना नेमके कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व मिळणार, याकडे स्थानिक भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शेजारील जिल्ह्यातील मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, सांगलीतील भाजपच्या नेत्यांनी भाजपलाच पालकमंत्रिपद मिळावे म्हणून पक्षाकडे आग्रह धरल्याचे समजते.

जिल्ह्यात भाजपचा झेंडा, तरीही मंत्रिपदाला ठेंगाजिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आठपैकी चार जागा जिंकल्या. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी दुप्पट जागा मिळविल्या. क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजपने झेंडा रोवल्यानंतरही सरकारमध्ये सांगलीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.

आघाडीच्या काळाशी तुलनाभाजपच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्ह्याच्या वाट्याला किती महत्त्वाची मंत्रिपदे येत होती, याचे उदाहरण देत मंत्रिपदासाठी अद्याप आग्रह कायम ठेवला आहे.

पतंगराव कदम यांच्याकडे दीर्घकाळ पदराज्यात २०१४ पूर्वी पंधरा वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या काळात पतंगराव कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषवले. आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्याकडे काही काळ पतंगराव कदम यांच्यापेक्षा महत्त्वाची खाती होती, मात्र जिल्ह्याचे पालक म्हणून नेहमी पतंगरावांनी स्थान भूषवले आणि प्रभावी कामही केले होते. त्या काळात जयंतरावांकडे नवी मुंबईची, तर आर. आर. आबांनी मागणी करीत गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती.

पालकमंत्रिपद सर्वच बाबींसाठी महत्वाचेपालकमंत्री हे पद कोणत्याही जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असते. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी खर्चाची, वाटप नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. नियोजन समितीसह विषय समित्यांच्या निवडींचे अधिकारही पालकमंत्र्यांनाच असतात. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, याकडे राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेचे लक्ष आहे.

टॅग्स :SangliसांगलीMahayutiमहायुतीguardian ministerपालक मंत्रीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस