शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक छळछावणीत.. नेते नामानिराळे; सांगलीतील चिंतामणीनगरच्या पुलाचे काम बंद कोणी पाडले?

By अविनाश कोळी | Updated: September 15, 2023 16:59 IST

पुलाच्या कामावरून संशयकल्लोळ

अविनाश कोळीसांगली : दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, नागरिक जीव मुठीत घेत सांगलीच्या जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे गेटवरील गर्दीतून वाट काढत आहेत. खराब रस्त्यावरून शरीराचे हाल करून घेताहेत. नागरिकांना अशा छळछावणीत टाकून लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, रेल्वे प्रशासन नामानिराळे झाले आहेत. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम राजकीय इशाऱ्यावरून थांबल्याचे सांगितले जात असल्याने नेत्यांबाबतचा संशयकल्लोळ वाढला आहे.सांगली ते माधवनगर या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी चिंतामणीनगरचा मुख्य रेल्वे उड्डाणपूल चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध न करताच पाडण्यात आला. जुना बुधगाव रस्ता हा अत्यंत गैरसोयीचा, अरुंद व खराब रस्ता नागरिकांच्या नशिबी आला. आठ महिने वनवास भोगण्याची मानसिकता नागरिकांनी केली. मात्र, राजकारण्यांच्या दबावामुळे उड्डाणपुलाचे काम बंद पडल्याने हा वनवास आणखी काही महिने वाढणार आहे. त्यामुळे लोकांचा संताप वाढत आहे.

रुळावर गर्दी अन् लाल दिवा लागला१३ सप्टेेंबर सायंकाळी ५:३० वाजता : बुधवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी एकदा गेट पडले. दहा मिनिटांनी ते उघडल्यानंतर दोन्ही बाजूंना अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी झाली असतानाच साडेपाच वाजता रेल्वे येणार असल्याने लाल दिवा लागला. रुळावर अनेक वाहने होती. ती हटायला तयार नाहीत. साऱ्यांना घाम फुटला. अखेर नागरिकांनीच कोंडी कमी करीत फाटक बंद करण्यास मदत केली.

पुलाच्या कामावरून संशयकल्लोळचिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम दोन नेत्यांनी बंद पाडल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. पुलाच्या दुतर्फा दोन नेत्यांच्या इमारती असल्याने हे काम बंद पाडण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. नेत्यांनीही मौन बाळगल्याने हा संशय वाढला आहे.

ठेकेदाराकडून प्रतिसाद नाहीरेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर नंतर बोलतो, असे सांगत फोन बंद केला. त्यामुळे ठेकेदाराची अडचण समजू शकली नाही.

नेते, अधिकारी गप्प का?खासदार, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, रेल्वे प्रशासन या सर्वांना लोकांच्या वेदना समजत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. रस्त्याची जबाबदारी महापालिकेची, वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची अन् उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांची असताना हे सारे लोक मौन बाळगून आहेत.

रुग्णांनाही थांबावे लागते ताटकळतअत्यवस्थ रुग्णांना या गेटवर अडकून पडावे लागते. रुग्णवाहिकाही अर्धा, पाऊण तास या रांगेत अडकतात. याठिकाणच्या वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी रेल्वेची असताना रेल्वे प्रशासन निद्रावस्थेत आहे. रेल्वे प्रशासन कोणालाही जुमानत नसल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमधून या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे.

पुलाच्या कामात बदलसांगलीतील भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी संबंधित ठेकेदाराकडे काम थांबल्याबाबत विचारणा केल्यानंतर ठेकेदाराने कामाची मार्गरेखा बदलल्याचे सांगितले. पण, त्याबाबत सविस्तर माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही.

टॅग्स :Sangliसांगली