शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कुणी घ्या भाजप, कुणी घ्या सेना!

By admin | Updated: July 5, 2014 23:58 IST

दिनकरतात्या, घोरपडेंचे तळ्यात-मळ्यात : शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, सुहास बाबर शिवसेनेच्या वाटेवर

श्रीनिवास नागे ल्ल सांगलीलोकसभेच्या निकालानंतर आमदारकीचे डोहाळे लागलेले जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा पाळणा हलविण्याची तयारी करून आतापासूनच काहीजण ‘कुणी घ्या भाजप, कुणी घ्या सेना’ अशी साद घालत आहेत, तर काहीजण जागावाटपाच्या घुगऱ्या वाटल्यानंतरच महायुतीच्या बाळाला जोजवणार आहेत. येत्या १३ जुलैला इस्लामपुरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिराळ्यातून माजी मंत्री शिवाजीराव नाईक, पलूस-कडेगावमधून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि खनापूर-आटपाडीतून अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर शिवसेनेचा धनुष्यबाण उचलणार आहेत, तर जतमधून विलासराव जगताप, खनापूर-आटपाडीतून रासपचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर भाजपचे कमळ फुलविण्याच्या तयारीत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजितराव घोरपडे, सांगलीतून माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपुरातून नाना महाडिक आणि त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक, खानापूर-आटपाडीतून अनिल बाबर आणि अमरसिंह देशमुख हे मात्र जागावाटप निश्चित झाल्यानंतर आणि तिकिटाची हमी दिली तरच सेना-भाजपचा पर्याय स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे सांगलीतून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, श्रीनिवास पाटील, नगरसेवक धनपाल खोत, तर इस्लामपूर आणि शाहूवाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचीही महायुतीतून चाचपणी सुरू आहे. ‘स्वाभिमानी’च्या अभिजित पाटील (इस्लामपूर), महेश खराडे (तासगाव-कवठेमहांकाळ), संदीप राजोबा (पलूस-कडेगाव) यांनी तर केव्हाचेच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील गणिते वेगवेगळी असतात, असे म्हटले जात असले तरी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, मोदी लाट आणि राज्यातील महायुतीचा प्रभाव अजून ओसरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दिग्गजांना महायुतीत जाऊन आमदार होण्याचे डोहाळे लागले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुसरी फळी आघाडीवर आहे. पक्षातील आधीच्या मंडळींत नव्याने येणाऱ्यांची भर पडल्याने भाजप-शिवसेनेत इच्छुकांची दाटी झाली आहे.मागीलवेळी भाजप-सेना युतीच्या जागावाटपात जत, सांगली, मिरज मतदारसंघ भाजपकडे होते. शिवसेनेच्या वाट्याला शिराळा, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, इस्लामपूर, पलूस-कडेगाव हे मतदारसंघ आले होते. त्यातील खानापूर-आटपाडीची जागा रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेला देण्यात आली होती. त्यापूर्वी इस्लामपूरची जागा भाजपकडे होती, ती मागीलवेळी सेनेला देण्यात आली. यंदा महायुती झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे पक्षही भाजप-सेनेसोबत दावेदार बनले आहेत. महायुतीने बाळसे धरल्याचे दिसताच सर्वच घटक पक्षांनी जागांवर दावे सुरू केले आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. तो वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल, पण तोपर्यंत जागावाटपात निश्चित मानल्या जागा पटकावण्यासाठी बाहेरून आलेले इच्छुक सरसावले आहेत. जागावाटपाच्या दोरीला खरा तिढा बसला आहे खानापूर-आटपाडीत. महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी पक्षत्याग करून भाजपप्रवेशाची तयारी सुरू केली आहे. त्यांचे आमदारकीचे डोहाळे पुरवण्याचे भाजपने ठरवले तर राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत येणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांची गोची होणार आहे. भाजपकडून तिकिटाची हमी मिळाल्याचा दावा पडळकर करत आहेत. मात्र त्यातील खरेखोटे समजण्यासाठी काही दिवस जावे लागतील. कारण महायुतीचे जागावाटप होताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ही पाहिले जाईलच. त्यामुळेच उमेदवारी मिळाल्याशिवाय पडळकर भाजपप्रवेश करणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडेंना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाचे संचालकपद देऊन राष्ट्रवादीने गप्प बसवले होते, पण आता पुन्हा त्यांनी आर. आर. पाटील यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खा. संजयकाकांना त्यांनी केलेली मदत, हा भाजपमधील प्रवेशाचा आणि तिकिटाचा राजमार्ग मानला जातो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी बोलणी केली आहेत, मात्र ही जागा भाजप की सेनेला, या वादामुळे ते थांबले आहेत. तथापि गेल्या दोन वर्षांपासून घोरपडेंनी या मतदारसंघात जोरदार पेरणी केली आहे. खा. संजयकाका आणि घोरपडेंनी मिळून आर. आर. पाटील यांना या मतदारसंघात ‘टार्गेट’ केले आहे. संजयकाका पाटील खासदार झाल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. विशेषत: अजितराव घोरपडे आक्रमक होऊ लागले आहेत. गाजावाजा न करता आर. आर. पाटील यांचा काटा काढण्याचा विरोधकांचा डाव राष्ट्रवादीने ओळखला आहे. गृहमंत्री पाटील यांच्याविरोधात राज्यभरातील विरोधक एकवटतात, हा मागील काही निवडणुकांचा अनुभव आहे. राष्ट्रवादीच्या काही मोजक्या ‘मास लीडर’मध्ये पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांची मुलूखमैदान तोफ राज्यभर धडधडत ठेवण्यासाठी अजितराव घोरपडे यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येईल आणि नंतर आर. आर. पाटील