शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांचे समविचारी नक्की कोण? : विशाल पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:28 IST

सांगली : काँग्रेसला संपविण्यासाठी राष्टÑीय स्वयंसेवक संघाची मदत घेणाऱ्या आणि भाजपला जवळ करणाऱ्या जयंत पाटील यांचे समविचारी नक्की कोण आहेत,

ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी गुंड, भ्रष्टाचाऱ्यांना नको

सांगली : काँग्रेसला संपविण्यासाठी राष्टय स्वयंसेवक संघाची मदत घेणाºया आणि भाजपला जवळ करणाºया जयंत पाटील यांचे समविचारी नक्की कोण आहेत, असा सवाल काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने गुंड, भ्रष्टाचाऱ्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, स्वत:च्या पक्षवाढीसाठी काँग्रेसची मदत घ्यायची आणि आतून भाजपशी हातमिळवणी करायची, हेच जयंतरावांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जयंतरावांचा सांगलीत सत्कार झाला. यावेळी त्यांनी समविचारी पक्षांनी महापालिका निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन केले होते. खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी येथे समविचारी नाहीत. २००८ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी

महाआघाडी करून काँग्रेसची सत्ता संपवली होती. त्यावेळी जयंतरावांनी संघाच्या आणि भाजपच्या उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन केला होता. भाजपला उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते. संभाजी पवार आणि भाजपची त्यांनी अनेक वर्षे साथसंगत केली. नेहमीच भाजपशी जवळीक साधणाऱ्या जयंतरावांचे समविचारी नक्की कोण आहेत? जयंतरावांनी याबाबत आम्हाला पटवून द्यावे.

महापालिकेच्या मागील निवडणुकीवेळी आर. आर. पाटील गृहमंत्री होते. मात्र राष्ट्रवादीने अनेक गुंडांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आर. आर. आबांनाही दरवेळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गुंड आहेत की नाही, हे तपासून यावे लागले होते. आताही राष्टवादी तशा लोकांना उमेदवारी देईल. त्यांच्यासोबत आम्ही आघाडी करावी का? भले काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाही तरी चालतील, पण यांची सोबत आम्हाला नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत काँग्रेसने नव्या, स्वच्छ चेहºयांना संधी द्यावी, असा आपला आग्रह आहे. गुंड, भ्रष्टाचारी आणि वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत. तरीही त्यांना उमेदवारी दिली, तर आपण त्यांचा प्रचार करणार नाही. या निवडणुकीत नेतृत्व कोणीही करो, पण चांगले उमेदवार द्यावेत. अनेकांनी महापालिकेत मक्तेदारी तयार केली आहे. त्यांनी महापालिकेची लूट केली आहे. त्यांना लोक कंटाळले आहेत. केवळ निवडून येण्याची क्षमता, एवढ्या पात्रतेवर त्यांना उमेदवारी देऊ नये. अन्यथा ते पक्ष संपवतील.

ते म्हणाले, मिरजेत मेळाव्यामध्ये मी जाहीरपणे बोललो आहे. वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे. पक्षात नव्याने येणाºया तरुणांना संधी मिळाली पाहिजे. मूठभर प्रस्थापितांना आणि पक्षासाठी काहीही न करणाºयांना आता बाजूला करावे. त्यांचे दबावाचे राजकारण चालवू देऊ नये.सुधीर गाडगीळांनी आता बोलावे!काँग्रेसने नाकारलेल्या, संधीसाधू भ्रष्टाचारी, मक्तेदारांना आता भाजप जवळ करू पाहत आहे. स्वच्छतेच्या आणि साधनशूचितेच्या गप्पा मारणाºया भाजपने अशा लोकांना तिकीट देणार का, हे आता जाहीर करावे. सध्या भाजपकडून सत्तेचा आधार घेऊन गुन्हेगारांना खटल्यातून सोडवणे, कारवाईतून वाचवणे सुरू आहे. हे फक्त निवडणुका जिंकण्यासाठी केले जात आहे. भाजपला हे कसे काय चालते, याचे उत्तर सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी द्यावे. मागील विधानसभा निवडणुकीत जयंतरावांच्या इशाऱ्यावर राष्ट्रवादीने गाडगीळांना मदतीचा हात दिला होता. महापालिका निवडणुकीतही तेच होणार आहे, असेही शेवटी विशाल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण