शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

By हणमंत पाटील | Updated: April 1, 2024 15:25 IST

संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक

हणमंत पाटीलसांगली : सांगलीनंतर महायुतीने हातकणंगलेमध्ये उमेदवार जाहीर केला. तरी महाविकास आघाडीतील गोंधळ अजून संपलेला नाही. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम जबाबदार आहेत. मात्र, हे तिन्ही नेते एकत्र न येता, परस्पर वेगवेगळी भूमिका घेत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

सांगली लोकसभा हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे आजही मतदारसंघातील गावागावांत काँग्रेसची पाळेमुळे म्हणजे कार्यकर्ते आहेत. लोकसभेच्या १९ पैकी १६ लोकसभा काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र, २०१४ पासूनच्या दोन निवडणुकांत पराभव झाल्याने काँग्रेस संपली हा दावा आततायीपणाचा होतोय. कोल्हापूर लोकसभा शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याने सांगलीच्या जागेवर उद्धवसेनेने दावा केला.दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश व उमेदवारी एकावेळी जाहीर करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस दुखावली. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व स्वत: इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी मुंबई व दिल्लीवारी केली. हा द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा आघाडीतील दोन्ही पक्षांतील नेते एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावू शकतात.

अशीच स्थिती हातकणंगले मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी दोनवेळा ‘मातोश्री’वर जाऊन सकारात्मक चर्चा करून आले. मात्र, अद्यापही राजू शेट्टींबाबत महाविकास आघाडी भूमिका घेण्यास तयार नाही. दरम्यानच्या काळात महायुतीकडून शिंदेसेनेने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली. तरीही स्वाभिमानीचे शेट्टी व महाविकास आघाडी यांचे उमेदवारीचे कोडे सुटलेले नाही. हे भिजत घोंगडे ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, त्यांनी या दोन्ही मतदारसंघांविषयीच्य भूमिकेविषयी मौन बाळगले आहे.

मौन बाळगून करेक्ट कार्यक्रम..सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी कमालीचे मौन बाळगले आहे. तरीही सांगलीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्राहार पाटील यांना त्यांचेच पाठबळ असल्याची आता उघडपणे चर्चा आहे. तसेच, हातकणंगले मतदारसंघातही राजू शेट्टी यांच्या उमेदवारीविषयी भूमिका घेण्याऐवजी महायुतीतील बंडखोर राहुल आवाडे यांना उद्धवसेनेचा मार्ग दाखविण्यातही पाटील यांचीच फूस असल्याचे उघडपणे बोलले जातेय.

दिल्ली दौऱ्याने प्रश्न सुटणार का?महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मुंबई व दिल्ली दौरे केले. त्याऐवजी मतदारसंघात मेळावा घेऊन दबाव गट निर्माण का केला नाही? मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी मिळाली नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेसची भूमिका काय, हे डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर केले पाहिजे. तरच काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदारांमध्ये स्पष्टता येईल.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीhatkanangle-acहातकणंगले