शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

By हणमंत पाटील | Updated: April 1, 2024 15:25 IST

संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक

हणमंत पाटीलसांगली : सांगलीनंतर महायुतीने हातकणंगलेमध्ये उमेदवार जाहीर केला. तरी महाविकास आघाडीतील गोंधळ अजून संपलेला नाही. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाचे प्रमुख नेते संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम जबाबदार आहेत. मात्र, हे तिन्ही नेते एकत्र न येता, परस्पर वेगवेगळी भूमिका घेत असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

सांगली लोकसभा हा काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. त्यामुळे आजही मतदारसंघातील गावागावांत काँग्रेसची पाळेमुळे म्हणजे कार्यकर्ते आहेत. लोकसभेच्या १९ पैकी १६ लोकसभा काँग्रेसने जिंकल्या आहेत. मात्र, २०१४ पासूनच्या दोन निवडणुकांत पराभव झाल्याने काँग्रेस संपली हा दावा आततायीपणाचा होतोय. कोल्हापूर लोकसभा शाहू महाराज काँग्रेसच्या चिन्हावर लढणार असल्याने सांगलीच्या जागेवर उद्धवसेनेने दावा केला.दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना पक्षप्रवेश व उमेदवारी एकावेळी जाहीर करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस दुखावली. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व स्वत: इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी मुंबई व दिल्लीवारी केली. हा द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा आघाडीतील दोन्ही पक्षांतील नेते एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावू शकतात.

अशीच स्थिती हातकणंगले मतदारसंघात आहे. महाविकास आघाडीत ही जागा उद्धवसेनेकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी दोनवेळा ‘मातोश्री’वर जाऊन सकारात्मक चर्चा करून आले. मात्र, अद्यापही राजू शेट्टींबाबत महाविकास आघाडी भूमिका घेण्यास तयार नाही. दरम्यानच्या काळात महायुतीकडून शिंदेसेनेने धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली. तरीही स्वाभिमानीचे शेट्टी व महाविकास आघाडी यांचे उमेदवारीचे कोडे सुटलेले नाही. हे भिजत घोंगडे ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक आहे. मात्र, त्यांनी या दोन्ही मतदारसंघांविषयीच्य भूमिकेविषयी मौन बाळगले आहे.

मौन बाळगून करेक्ट कार्यक्रम..सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी कमालीचे मौन बाळगले आहे. तरीही सांगलीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्राहार पाटील यांना त्यांचेच पाठबळ असल्याची आता उघडपणे चर्चा आहे. तसेच, हातकणंगले मतदारसंघातही राजू शेट्टी यांच्या उमेदवारीविषयी भूमिका घेण्याऐवजी महायुतीतील बंडखोर राहुल आवाडे यांना उद्धवसेनेचा मार्ग दाखविण्यातही पाटील यांचीच फूस असल्याचे उघडपणे बोलले जातेय.

दिल्ली दौऱ्याने प्रश्न सुटणार का?महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी मुंबई व दिल्ली दौरे केले. त्याऐवजी मतदारसंघात मेळावा घेऊन दबाव गट निर्माण का केला नाही? मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी मिळाली नाही, तर जिल्ह्यातील काँग्रेसची भूमिका काय, हे डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर केले पाहिजे. तरच काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदारांमध्ये स्पष्टता येईल.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीhatkanangle-acहातकणंगले