शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मसुचीवाडी प्रकरण पेटवतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST

सरपंचांपुढे मोठे आव्हान : राजकारणामुळे गावांमधील धग कायम

अशोक पाटील -- इस्लामपूर --मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणात बोरगावचे नाव बदनाम झाले आहे. महिला संघटनांनीही यामध्ये राजकारण आणल्याने हे प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून धगधगत राहिले आहे. सरपंच सुहास कदम यांच्यावर पोलिसांचा दबाव असून बोरगावसह मुख्य सूत्रधार असलेल्या गुंडासह राजकारण्यांचीही भीती आहे. हे प्रकरण कोण पेटवत आहे, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.मुलींना न्याय देण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दोनवेळा मसुचीवाडी गावाला भेट देऊन नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. मुख्य आरोपीस तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पहिल्या भेटीवेळी दिला होता. १५ दिवस झाले, मुख्य आरोपी फरारीच आहे. मग देसाई यांच्या ठिय्या आंदोलनाचे काय झाले, त्यांचा इशारा पोकळच ठरला, अशी चर्चा सुरू झाली आहे.देसाई यांच्या या भूमिकेवर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी टीका केली होती. देसाई यांनी या प्रकरणात राजकारण आणू नये, असा सल्लाही दिला होता. या घटनेनंतर १0 दिवसांनी आमदार गोऱ्हे यांनी मसुचीवाडी येथे येण्याचा घाट घातला. खरे तर मसुचीवाडी येथील वातावरण शांत झालेले आहे, आपण येऊ नये, अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. परंतु राजकीय हेतूने गोऱ्हे यांनी मसुचीवाडीला भेट दिली. त्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी मसुचीवाडीला भेट दिली. परंतु गावातील महिलांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला. या प्रकरणात न्याय मिळत नसेल, तर आम्ही विविध संघटना, नेत्यांसमोर का जावे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे देसाई यांनी इस्लामपूर येथे पोलिसांना आंदोलनाचा इशारा दिला.आता सरपंच सुहास कदम यांना दूरध्वनीवरुन धमक्या येऊ लागल्या आहेत. कदम यांनी प्रसिध्दी माध्यमे, महिला संघटना आणि नेत्यांपुढे वेगवेगळे मते मांडले आहे. हे प्रकरण हाताळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.बोरगाव आणि मसुचीवाडी गावांतील वातावरण आजही धगधगत आहे. हे वातावरण शमविण्यासाठी दोन्ही गावांतील लोकप्रतिनिधी, पोलिस व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.