शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

मसुचीवाडी प्रकरण पेटवतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST

सरपंचांपुढे मोठे आव्हान : राजकारणामुळे गावांमधील धग कायम

अशोक पाटील -- इस्लामपूर --मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणात बोरगावचे नाव बदनाम झाले आहे. महिला संघटनांनीही यामध्ये राजकारण आणल्याने हे प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून धगधगत राहिले आहे. सरपंच सुहास कदम यांच्यावर पोलिसांचा दबाव असून बोरगावसह मुख्य सूत्रधार असलेल्या गुंडासह राजकारण्यांचीही भीती आहे. हे प्रकरण कोण पेटवत आहे, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.मुलींना न्याय देण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दोनवेळा मसुचीवाडी गावाला भेट देऊन नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. मुख्य आरोपीस तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पहिल्या भेटीवेळी दिला होता. १५ दिवस झाले, मुख्य आरोपी फरारीच आहे. मग देसाई यांच्या ठिय्या आंदोलनाचे काय झाले, त्यांचा इशारा पोकळच ठरला, अशी चर्चा सुरू झाली आहे.देसाई यांच्या या भूमिकेवर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी टीका केली होती. देसाई यांनी या प्रकरणात राजकारण आणू नये, असा सल्लाही दिला होता. या घटनेनंतर १0 दिवसांनी आमदार गोऱ्हे यांनी मसुचीवाडी येथे येण्याचा घाट घातला. खरे तर मसुचीवाडी येथील वातावरण शांत झालेले आहे, आपण येऊ नये, अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. परंतु राजकीय हेतूने गोऱ्हे यांनी मसुचीवाडीला भेट दिली. त्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी मसुचीवाडीला भेट दिली. परंतु गावातील महिलांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला. या प्रकरणात न्याय मिळत नसेल, तर आम्ही विविध संघटना, नेत्यांसमोर का जावे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे देसाई यांनी इस्लामपूर येथे पोलिसांना आंदोलनाचा इशारा दिला.आता सरपंच सुहास कदम यांना दूरध्वनीवरुन धमक्या येऊ लागल्या आहेत. कदम यांनी प्रसिध्दी माध्यमे, महिला संघटना आणि नेत्यांपुढे वेगवेगळे मते मांडले आहे. हे प्रकरण हाताळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.बोरगाव आणि मसुचीवाडी गावांतील वातावरण आजही धगधगत आहे. हे वातावरण शमविण्यासाठी दोन्ही गावांतील लोकप्रतिनिधी, पोलिस व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.