शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राजू शेट्टी-जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? : भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:55 IST

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही.

ठळक मुद्दे निवडणुकीचे रंग ; दोन्ही पक्षांकडून ताकदीचे प्रदर्शन महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही. सध्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची नावे भाजपच्या श्रेष्ठींपुढे आहेत; तर व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर शड्डू ठोकला आहे.

भाजपकडून वैभव नायकवडी यांनाही आमंत्रित करण्याचा डाव आखला जात आहे. एकूणच भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार दिसत आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे गृहीत धरूनच शिराळा मतदारसंघात भाजपची वाटचाल सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ‘आमदार नाईक पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर’ या चर्चेला उधाण आले होते. यावर स्वत: शिवाजीराव नाईक यांनी पडदा टाकला आहे. आता तर त्यांनी हातकणंगलेतून भाजपचाच खासदार होणार, असे भाकीत करून भाजपवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. परंतु खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण? यावर आमदार नाईक यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इस्लामपूर नगरपालिकेत परिवर्तन झाले असले तरी, जयंत पाटील यांची ताकद आजही मतदारसंघात अभेद्य असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांची नावे असली तरी, महाडिक आणि हुतात्मा गटाची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार म्हणून एकमताने एकही नाव अद्याप पुढे आलेले नाही.

एकंदरीत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले आहे. देशातील महागाईच्या विरोधातील पहिला मोर्चा इस्लामपूर येथे काढून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. या मोर्चात सहभागी १० ते १२ हजार जनसमुदाय पाहून विरोधी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.यापूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद तपासली आहे. आता राष्ट्रवादीच्या या मोर्चाला भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडेच इस्लामपूरकरांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील