शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी-जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? : भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:55 IST

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही.

ठळक मुद्दे निवडणुकीचे रंग ; दोन्ही पक्षांकडून ताकदीचे प्रदर्शन महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले

अशोक पाटील ।इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि इस्लामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण? यावर भाजप-शिवसेनेकडून कोणालाही हिरवा कंदील मिळालेला नाही. सध्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची नावे भाजपच्या श्रेष्ठींपुढे आहेत; तर व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे नेते राहुल महाडिक यांनी स्वबळावर शड्डू ठोकला आहे.

भाजपकडून वैभव नायकवडी यांनाही आमंत्रित करण्याचा डाव आखला जात आहे. एकूणच भाजपच्या झेंड्याला ‘रयत’ची किनार दिसत आहे.भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांना मंत्रिपद मिळणार, हे गृहीत धरूनच शिराळा मतदारसंघात भाजपची वाटचाल सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात ‘आमदार नाईक पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर’ या चर्चेला उधाण आले होते. यावर स्वत: शिवाजीराव नाईक यांनी पडदा टाकला आहे. आता तर त्यांनी हातकणंगलेतून भाजपचाच खासदार होणार, असे भाकीत करून भाजपवरील आपली निष्ठा दाखवून दिली आहे. परंतु खासदार शेट्टी यांच्याविरोधात कोण? यावर आमदार नाईक यांनी मौन पाळले आहे.

इस्लामपूर येथे महागाईविरोधात राष्ट्रवादीने काढलेला मोर्चा भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. इस्लामपूर नगरपालिकेत परिवर्तन झाले असले तरी, जयंत पाटील यांची ताकद आजही मतदारसंघात अभेद्य असल्याचे दिसते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपपुढे सदाभाऊ खोत, निशिकांत पाटील यांची नावे असली तरी, महाडिक आणि हुतात्मा गटाची भूमिका आजही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार म्हणून एकमताने एकही नाव अद्याप पुढे आलेले नाही.

एकंदरीत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात दौरा करताना आपले लक्ष आपल्या इस्लामपूर मतदारसंघावरही केंद्रित केले आहे. देशातील महागाईच्या विरोधातील पहिला मोर्चा इस्लामपूर येथे काढून राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली आहे. या मोर्चात सहभागी १० ते १२ हजार जनसमुदाय पाहून विरोधी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे.यापूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून आपली ताकद तपासली आहे. आता राष्ट्रवादीच्या या मोर्चाला भाजप काय प्रत्युत्तर देणार, याकडेच इस्लामपूरकरांचे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत Jayant Patilजयंत पाटील