शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कुठे आहे आता महाराष्ट्र आपला?

By admin | Updated: October 25, 2015 23:29 IST

अशोक चव्हाण : ग्रेस मार्क देऊनही राज्यातील भाजप सरकार नापासच

सांगली : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने वर्षभरानंतर आता महाराष्ट्र कुठे आहे, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. ग्रेस मार्क देऊनही हे सरकार नापासच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना कोणतेही गांभीर्य नाही. प्रशासनावर, पोलीस यंत्रणेवर त्यांचा अंकुश नाही. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकारची ठोस भूमिका नाही. पुरावे हाती लागूनही सरकारला यात काही करता आले नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. साहित्यिक, विचारवंतांनी त्यांचे पुरस्कार परत देण्यास सुरुवात केली आहे. इतकी गोंधळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी मदत याबाबत आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. साखर कारखाने व ऊस दराबाबतही तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. कारखाने कोणाचे आहेत, हे न पाहता निर्णय घ्यायला हवेत. सरकारच्या एक वर्षाच्या कालावधिचा विचार करता ग्रेस मार्कस् देऊनही हे सरकार पास होणार नाही. सरकारच्या धोरणांचा अंदाज आता लोकांना आला आहे. त्यामुळे या सरकारविषयी शेतकरी, सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने आता पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज राज्याला आहे. विरोधक म्हणून आम्ही सक्षमपणे आमची भूमिका बजावत आहोत. आमचे सरकार असताना कोणत्याही गोष्टीवर भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने स्टंटबाजी करीत होती, तशी स्टंटबाजी करण्याची आम्हाला गरज नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्योजकांना माफी, शेतकऱ्यांना नाहीजिंदाल कंपनीला साडेआठशे कोटी रुपयांची माफी एका क्षणात देणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना विचार करावा लागत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन नसताना, एलबीटीला माफी दिली जाते. महापालिकांचे निम्मे उत्पन्न घटले तरीही सरकारला सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. शिवसेनेच्या वेगळ्या भूमिकाएकीकडे सत्तेतही रहायचे आणि दुसरीकडे सरकारला बाहेरून विरोधही करायचा, अशा वेगवेगळ््या भूमिका शिवसेना घेत आहे. ते सत्तेत असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे चव्हाण म्हणाले.मध्यावधीचेच संकेतगेल्या काही दिवसांपासून सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांना काळे फासण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, त्यावरून त्यांची दिशा कळत आहे. सरकार फार दिवस टिकणार नाही, याचेच हे संकेत आहेत.