शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

कुठे आहे आता महाराष्ट्र आपला?

By admin | Updated: October 25, 2015 23:29 IST

अशोक चव्हाण : ग्रेस मार्क देऊनही राज्यातील भाजप सरकार नापासच

सांगली : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने वर्षभरानंतर आता महाराष्ट्र कुठे आहे, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. ग्रेस मार्क देऊनही हे सरकार नापासच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना कोणतेही गांभीर्य नाही. प्रशासनावर, पोलीस यंत्रणेवर त्यांचा अंकुश नाही. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकारची ठोस भूमिका नाही. पुरावे हाती लागूनही सरकारला यात काही करता आले नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. साहित्यिक, विचारवंतांनी त्यांचे पुरस्कार परत देण्यास सुरुवात केली आहे. इतकी गोंधळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी मदत याबाबत आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. साखर कारखाने व ऊस दराबाबतही तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. कारखाने कोणाचे आहेत, हे न पाहता निर्णय घ्यायला हवेत. सरकारच्या एक वर्षाच्या कालावधिचा विचार करता ग्रेस मार्कस् देऊनही हे सरकार पास होणार नाही. सरकारच्या धोरणांचा अंदाज आता लोकांना आला आहे. त्यामुळे या सरकारविषयी शेतकरी, सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने आता पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज राज्याला आहे. विरोधक म्हणून आम्ही सक्षमपणे आमची भूमिका बजावत आहोत. आमचे सरकार असताना कोणत्याही गोष्टीवर भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने स्टंटबाजी करीत होती, तशी स्टंटबाजी करण्याची आम्हाला गरज नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्योजकांना माफी, शेतकऱ्यांना नाहीजिंदाल कंपनीला साडेआठशे कोटी रुपयांची माफी एका क्षणात देणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना विचार करावा लागत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन नसताना, एलबीटीला माफी दिली जाते. महापालिकांचे निम्मे उत्पन्न घटले तरीही सरकारला सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. शिवसेनेच्या वेगळ्या भूमिकाएकीकडे सत्तेतही रहायचे आणि दुसरीकडे सरकारला बाहेरून विरोधही करायचा, अशा वेगवेगळ््या भूमिका शिवसेना घेत आहे. ते सत्तेत असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे चव्हाण म्हणाले.मध्यावधीचेच संकेतगेल्या काही दिवसांपासून सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांना काळे फासण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, त्यावरून त्यांची दिशा कळत आहे. सरकार फार दिवस टिकणार नाही, याचेच हे संकेत आहेत.