शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

कुठे आहे आता महाराष्ट्र आपला?

By admin | Updated: October 25, 2015 23:29 IST

अशोक चव्हाण : ग्रेस मार्क देऊनही राज्यातील भाजप सरकार नापासच

सांगली : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने वर्षभरानंतर आता महाराष्ट्र कुठे आहे, याचे उत्तर द्यावे, असे आवाहन कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले. ग्रेस मार्क देऊनही हे सरकार नापासच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.मदन पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी चव्हाण सांगलीत आले होते. यावेळी ते म्हणाले की, सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांना कोणतेही गांभीर्य नाही. प्रशासनावर, पोलीस यंत्रणेवर त्यांचा अंकुश नाही. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सरकारची ठोस भूमिका नाही. पुरावे हाती लागूनही सरकारला यात काही करता आले नाही. सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी त्यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही. साहित्यिक, विचारवंतांनी त्यांचे पुरस्कार परत देण्यास सुरुवात केली आहे. इतकी गोंधळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळी मदत याबाबत आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. साखर कारखाने व ऊस दराबाबतही तातडीने निर्णय घेणे गरजेचे होते. कारखाने कोणाचे आहेत, हे न पाहता निर्णय घ्यायला हवेत. सरकारच्या एक वर्षाच्या कालावधिचा विचार करता ग्रेस मार्कस् देऊनही हे सरकार पास होणार नाही. सरकारच्या धोरणांचा अंदाज आता लोकांना आला आहे. त्यामुळे या सरकारविषयी शेतकरी, सर्वसामान्य जनतेत नाराजी आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडल्याने आता पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज राज्याला आहे. विरोधक म्हणून आम्ही सक्षमपणे आमची भूमिका बजावत आहोत. आमचे सरकार असताना कोणत्याही गोष्टीवर भाजप व शिवसेना ज्या पद्धतीने स्टंटबाजी करीत होती, तशी स्टंटबाजी करण्याची आम्हाला गरज नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)उद्योजकांना माफी, शेतकऱ्यांना नाहीजिंदाल कंपनीला साडेआठशे कोटी रुपयांची माफी एका क्षणात देणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना विचार करावा लागत आहे. कोणतेही आर्थिक नियोजन नसताना, एलबीटीला माफी दिली जाते. महापालिकांचे निम्मे उत्पन्न घटले तरीही सरकारला सामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. शिवसेनेच्या वेगळ्या भूमिकाएकीकडे सत्तेतही रहायचे आणि दुसरीकडे सरकारला बाहेरून विरोधही करायचा, अशा वेगवेगळ््या भूमिका शिवसेना घेत आहे. ते सत्तेत असल्याने त्यांना सरकारच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असे चव्हाण म्हणाले.मध्यावधीचेच संकेतगेल्या काही दिवसांपासून सत्तेतील दोन्ही पक्ष एकमेकांना काळे फासण्याचा जो प्रयत्न करीत आहेत, त्यावरून त्यांची दिशा कळत आहे. सरकार फार दिवस टिकणार नाही, याचेच हे संकेत आहेत.