शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

गुळाच्या ढेपेची गोडी आमच्या जीवनात कुठली? ऊस गाळताना आयुष्याचे झाले चिपाड, गुऱ्हाळ कामगारांच्या व्यथा

By हणमंत पाटील | Updated: December 13, 2023 13:01 IST

Sangli News: जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.

- हणमंत पाटील/सहदेव खोतपुनवत - जगण्यात ना कुठला डामडौल, ना कुठली हौसमौज! ना कुठली चेन अन् ना जगण्यात झगमगाट. वर्षभर मिळेल तो कामधंदा करत राबराब राबायचं आणि चरितार्थ चालवायचा. कष्टाची कामे करता करता आमच्या आयुष्याचेच जणू चिप्पाड झाले आहे, अशी व्यथा गुऱ्हाळघरातील कामगारांनी मांडली.

शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यात सध्या गुऱ्हाळ हंगाम जोरात सुरू आहे. तेथे मोठ्या संख्येने कामगार काम करत आहेत. ठिकठिकाणाहून स्थलांतर करून आलेले कामगार गुऱ्हाळाचा हंगाम संपल्यानंतर अन्य कामांच्या शोधात निघून जातात. दरवर्षी गुऱ्हाळ हंगामात त्यांना दोन-तीन महिन्यांचा रोजगार मिळतो. 

पूर्वीप्रमाणे स्थानिक लोक आता गुऱ्हाळघरात काम करत नाहीत. गुऱ्हाळ मालकांना बाहेरून कामगार आणावे लागतात. सर्रास गुऱ्हाळघरात भूमिहीन मजूर, गोसावी व गोपाळ समाजातील लोक काम करतात. कामाचा चांगला मोबदला मिळत असला, तरी हाडाची काडे करून राबल्याशिवाय पर्याय नसतो. उसाच्या घाण्यावर, चिप्पाडावर काम करणाऱ्या या कामगारांचा दिवस पहाटे पाचपासूनच सुरू होतो.

वजनदार मोळ्या उचलून चाप लावावा लागतो. तीनचार आधणांचा ऊस गाळावा लागतो. गाळप झालेली चिपाडे वाळविण्यासाठी वाहून गुऱ्हाळघराबाहेर न्यावी लागतात. हे काम दिवसभर न संपणारे असते. चुलवाणाला चिपाडाचे जळण पुरवावे लागते. वाळलेल्या चिपाडाची व्हळी घालावी लागते. दिवस मावळतीकडे निघाल्यावर थोडावेळ अंग जमिनीवर टाकण्यासाठी उसंत मिळते. पण, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हे रहाटगाडगे सुरू होते.

मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदागुऱ्हाळ हंगाम संपला की, दुसरे काम शोधण्यासाठी वणवण करावी लागते. जगण्याच्या या संघर्षात मुलाबाळांच्या शिक्षणाची आबदा होते. शिक्षणाअभावी ते देखील आई-वडिलांच्या मार्गावरच गुऱ्हाळघरे किंवा अन्य मजुरीची कामे करण्याच्या मार्गावर येतात. त्यांच्या जिंदगानीत कष्टाशिवाय पर्याय राहत नाही. जगण्याचे ओझे पेलताना आपण पुढारलेल्या समाजाच्या कोसो मागे राहतोय याची जाणीव कामगारांना आयुष्यभर बोचत राहते. सुखाची तिरीप यावी म्हणूनअसंघटित कामगारांसाठी शासनाच्या अनेक योजना असल्या, तरी त्यांचा प्रकाश या कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. कोणीतरी भलतेच त्यांचा लाभ उटवितात, खरे गरजू मात्र वंचितच राहतात. गुळाच्या ढेपेखाली ओझ्याने दबलेल्या आयुष्यात सुखाच्या प्रकाशाची थोडीशी तिरीप यावी इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगली