शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

दुष्काळाच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष कधी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 00:17 IST

जयंत पाटील : दुष्काळी समस्यांवर सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

सांगली : जिल्ह्यातील दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या, पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा एवढ्या दोनच माफक अपेक्षा असून, त्या पूर्ण करण्यातही शासनाकडून चालढकल सुरू आहे. विशेषत: जत तालुक्यात जनावरांचा जीव जाण्याअगोदर तिथे तातडीने चारा छावण्या सुरू करणे आवश्यक असून, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी बाहेर पडायला सांगा, अशा सूचना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरूवारी दिल्या. आ. पाटील यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौरा पूर्ण केला. त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या समस्या व उपाय यावर चर्चा क रून तोडगा काढण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला सर्व प्रांत, तहसीलदार, त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीलाच आ. पाटील यांनी जत तालुक्यातील पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न बैठकीत मांडला. जत तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर असून यावर प्रशासन काही उपाययोजना करणार आहे का? असा सवाल करीत, जनावरांचा जीव जाण्याअगोदर तिथे चारा छावण्या सुरू करा, असे पाटील यांनी सांगितले. यावर, चारा छावणी मंजुरीचे अधिकार कॅबिनेटला असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय व्हायला हवा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चारा छावणी सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणे अपेक्षित असताना, मंत्रीच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावर पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले. जत तालुक्यात दौरा करीत असताना तहसीलदारांविषयी व अधिकाऱ्यांविषयी नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले की, तहसीलदारांना बाहेर फिरायला सांगा. उमदी येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली. यावर, तहसीलदारांना पाठवून उपोषण मागे घेण्यास सांगू, असे सांगताच जत तालुक्यातील नेत्यांनी, तहसीलदार नको, प्रांतांना पाठवा, अशी मागणी केली. तासगाव तालुक्याचा आढावा घेताना नेहरूनगर येथील लोकांची जागा रितसर त्यांच्या नावावर करून देण्यात यावी असे सांगत, मतकुणकी येथील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची सूचना त्यांनी केली. अग्रणी नदीत पाणी सोडण्यात यावे, सहा गावांसाठी एक तलाठी अशी परिस्थिती आहे, यावर तोडगा काढावा, वायफळे येथे १४ टॅँकर अपेक्षित असताना तिथे चार टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकरमध्ये वाढ करावी, धनगाव पाणी योजना पुन्हा सुरू करावी, मोराळे तलावाची गळती काढावी आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.आटपाडी तालुक्यातील समस्या मांडताना जयंत पाटील म्हणाले की, या तालुक्याला पैसे भरूनही टेंभूतून पाणी मिळाले नाही. सांगोल्यास पाणी देण्यात येत असताना, आटपाडी तालुक्यावर अन्याय का? हे असेच राहिले, तर दोन तालुक्यातील संघर्ष वाढेल, असेही ते म्हणाले. झरे येथे रमाई आवास योजनेची कामे होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे, जांभुळणी येथे असणाऱ्या बंधाऱ्यांची दारे पूर्ण बंद करण्यात यावीत, राजेवाडी येथील कालव्याचे काम पूर्ण करण्यात यावे, रोहयोच्या कामांना गती द्यावी आदी मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मनोज शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अविनाश पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रवीण साळुंखे, वन अधिकारी समाधान चव्हाण, तहसीलदार रूपाली सरनोबत, किशोर घाडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)