शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:47 IST

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. ...

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. पण, गणनेत वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वाघांची डरकाळी येथे कधी घुमणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील वाघांची संख्या ३१२ असली तरीही, सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०१९ मध्ये वाघांची संख्या ३१२ आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या आकड्यांनुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र चांदोली, कोयना, दाजीपूर या तीनही अभयारण्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांत एकाही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही. दरवर्षी व्याघ्र गणना करण्यात येते. पण वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही, की मुद्दाम वन्यजीव विभाग माहिती देत नाही, हा प्रश्न आहे.व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजना राबविली जात आहे. यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढविण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांसोबतच पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.