शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:47 IST

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. ...

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. पण, गणनेत वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वाघांची डरकाळी येथे कधी घुमणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील वाघांची संख्या ३१२ असली तरीही, सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०१९ मध्ये वाघांची संख्या ३१२ आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या आकड्यांनुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र चांदोली, कोयना, दाजीपूर या तीनही अभयारण्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांत एकाही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही. दरवर्षी व्याघ्र गणना करण्यात येते. पण वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही, की मुद्दाम वन्यजीव विभाग माहिती देत नाही, हा प्रश्न आहे.व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजना राबविली जात आहे. यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढविण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांसोबतच पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.