शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:47 IST

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. ...

वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. पण, गणनेत वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वाघांची डरकाळी येथे कधी घुमणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राज्यातील वाघांची संख्या ३१२ असली तरीही, सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०१९ मध्ये वाघांची संख्या ३१२ आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या आकड्यांनुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र चांदोली, कोयना, दाजीपूर या तीनही अभयारण्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांत एकाही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही. दरवर्षी व्याघ्र गणना करण्यात येते. पण वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही, की मुद्दाम वन्यजीव विभाग माहिती देत नाही, हा प्रश्न आहे.व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजना राबविली जात आहे. यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढविण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांसोबतच पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.