शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:17 IST

सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.

ठळक मुद्देसांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडी

सांगली : शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.शहरात सुमारे दीड लाखांहून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. प्रत्येक कुटुंबामागे किमान एक तरी वाहन आहे. त्यात घरात वाहन पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क केली जात आहेत. सर्वात बिकट अवस्था मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठ, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोडवर दिसून येते. या परिसरात शाळा क्रमांक एक, आनंद चित्रमंदिर, जयश्री टॉकीज अशी वाहनतळे आहेत. त्यापैकी शाळा क्रमांक एकनजीकच वाहनांची गर्दी दिसून येते. अन्य ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात.मारुती रोड तर नेहमीच गजबजलेला असतो. या रस्त्यावर वाहन पार्क करण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. शहरातील शासकीय रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चांदणी चौक, विश्रामबाग चौक, काँग्रेस भवन या भागात वाहनतळच नाही. विश्रामबाग चौकात तर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर विक्रेते, हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बहुतांश रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.

शासकीय रुग्णालय चौकात तर नेहमीच वाहनांची गर्दी असते. जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील बाजू, इंदिरा भवन चौकात मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींसमोरच वाहने पार्क केली जातात. वाहनतळाची सुविधा नसल्याने नागरिकांनाही वाहन पार्क करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागते. त्यातच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने पुन्हा नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. या साऱ्या प्रकारांमुळे वाहनधारकांत असंतोष वाढला आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSangliसांगली