शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

साखर कारखानदारांचे एमडी काय तोडगा काढणार? अध्यक्षांना बोलवा; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांचा चर्चेस नकार

By अशोक डोंबाळे | Updated: November 15, 2023 08:58 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ: 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांचा एमडीबरोबर चर्चा करण्यास नकार; चार दिवसात पुन्हा बैठक 

सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागील गळती हंगामातील ४०० आणि चालू हंगामात ३५०० रुपये ऊस उत्पादकांना मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन चालू आहे. या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी बोलविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांनी कारखान्यांचे (एमडी) व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चेस नकारा दिला. कारखान्यांच्या अध्यक्षां बरोबर बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार चार दिवसात पुन्हा बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासन दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली, 'स्वाभिमानी'चे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, महेश खराडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, सर्व कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. या बैठकीत संदीप राजोबा यांनी कारखान्यांचे कार्यकारी संचालक ऊस दराबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांबरोबर बैठक घेऊन ऊस दराची कोंडी फोडावी, त्यानंतरच कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्याची विनंती केली. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी याना निमंत्रित करण्याची मागणी केली. त्यानुसार डॉ. राजा दयानिधी यांनी पुन्हा चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

तोडगा निघेपर्यंत ऊस तोडो रोखू नका: राजा दयानिधी ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी पुन्हा चार दिवसात बैठक घेण्यात येणार आहे. दराचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलकांना ऊस तोडी रोखू नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्‍यांना दिली.

दत्त इंडिया आजपासून ऊस तोडी थांबविणार : संदीप राजोबासांगलीतील वसंतदादा साखर कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्याना व्यवस्थापनाने जोपर्यंत ऊस दराची कोंडी फुटत नाही, तोपर्यंत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांना कारखाना व्यवस्थापनाने दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगली