शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर भरोसा हाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:25 IST

तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर भरोसा हाय का?

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला प्रतिसाद देत तासगावकर जनतेने भाजपला पालिकेची सत्ता बहाल केली. मात्र सत्तेत आल्यापासून सत्ताधारी कारभारी राजकीय कुरघोड्या करण्यात मश्गुल आहेत. शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्याही नियोजनाअभावी खर्ची टाकण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच शहरातील नागरी समस्यांमुळे तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांच्या विकासावर भरोसा हाय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.तासगाव नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आली. खासदार संजयकाकांनी शासनदरबारी वजन वापरुन कोट्यवधींचा निधी मंजूर आणला आहे. मात्र नगरपालिकेकडून हा निधी खर्ची टाकताना, जनतेचे गरजेपेक्षा कारभाऱ्यांच्या सोयीलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. इतकेच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, झालेल्या कामाची गुणवत्ता हा संशोधनाचा विषय ठरला आहे. सल्लागार अभियंत्यांच्या भरवशावर बेभरवशाची कामे होत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.पालिकेच्या नियोजनहीन कारभारामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. चोवीस तास पाणी योजनेचा ढोल पिटण्यात आला. त्यासाठी प्रत्येक नळकनेक्शनधारकाला मीटर जोडण्यात आली; मात्र जाडलेली मीटर निकृष्ट दर्जाची असल्याने ही मीटर कुचकामी ठरली. त्यामुळे चोवीस तास पाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम अनेक महिन्यांंपासून रखडलेले आहे. पुतळा उभारणीवेळी दोन महिन्यांत नवीन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत पुतळा उभारणी झाली नसल्याने शिवप्रेमींत नाराजी आहे. तासगाव शहर सीसीटीव्हीमय करण्याबाबत अनेकदा घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत सीसीटीव्हीला मुहूर्त लागलेला नाही.पावसाळ्यात शहरातील मळी भागातील नागरिकांना सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागतो. शहरातील लांडघोलमळा, चपाटे मळा, वडमळा, खानापुरे मळा, मिरजकर मळा, म्हेत्रे मळा, खाडेवाडीसह अनेक मळीभागात रस्त्यांची दुरवस्था आहे. नागरिकांकडून मुरुमीकरणाची मागणी होऊनदेखील पालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मळीभागात दलदलीचे साम्राज्य झाले आहे.अशा एक ना अनेक समस्यांचा सामना तासगावकरांना करावा लागत असताना, सत्ताधारी समस्या नामशेष करण्याऐवजी, पालिकेतील विरोधकांना नामशेष करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. केवळ कुरघोड्यांचे राजकारण करुन राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात सत्ताधारी कारभारी मश्गुल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत, सत्तेत बसवलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांवर भरवसा राहिलाय का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.बेकायदा बांंधकामावर हातोडा केव्हा? भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला पाटील यांचे बेकायदा बांधकाम असल्याने नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या नव्हे, तर शहरातील अनेक बड्या लोकांंनी पालिकेच्या अनेक मोक्याच्या जागांवर बेकायदा अतिक्रमण केले आहे. अशा जागा सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? असा सवालही उपस्थित होत आहे.