शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर भरोसा हाय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 23:25 IST

तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांवर भरोसा हाय का?

दत्ता पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : भाजपच्या विकासाच्या अजेंड्याला प्रतिसाद देत तासगावकर जनतेने भाजपला पालिकेची सत्ता बहाल केली. मात्र सत्तेत आल्यापासून सत्ताधारी कारभारी राजकीय कुरघोड्या करण्यात मश्गुल आहेत. शासनाकडून आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कोणत्याही नियोजनाअभावी खर्ची टाकण्यात धन्यता मानत आहेत. त्यातच शहरातील नागरी समस्यांमुळे तासगावकरांचा सत्ताधाऱ्यांच्या विकासावर भरोसा हाय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.तासगाव नगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. तेव्हापासून सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आली. खासदार संजयकाकांनी शासनदरबारी वजन वापरुन कोट्यवधींचा निधी मंजूर आणला आहे. मात्र नगरपालिकेकडून हा निधी खर्ची टाकताना, जनतेचे गरजेपेक्षा कारभाऱ्यांच्या सोयीलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. इतकेच नव्हे, तर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, झालेल्या कामाची गुणवत्ता हा संशोधनाचा विषय ठरला आहे. सल्लागार अभियंत्यांच्या भरवशावर बेभरवशाची कामे होत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.पालिकेच्या नियोजनहीन कारभारामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. चोवीस तास पाणी योजनेचा ढोल पिटण्यात आला. त्यासाठी प्रत्येक नळकनेक्शनधारकाला मीटर जोडण्यात आली; मात्र जाडलेली मीटर निकृष्ट दर्जाची असल्याने ही मीटर कुचकामी ठरली. त्यामुळे चोवीस तास पाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे काम अनेक महिन्यांंपासून रखडलेले आहे. पुतळा उभारणीवेळी दोन महिन्यांत नवीन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्यापपर्यंत पुतळा उभारणी झाली नसल्याने शिवप्रेमींत नाराजी आहे. तासगाव शहर सीसीटीव्हीमय करण्याबाबत अनेकदा घोषणा करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत सीसीटीव्हीला मुहूर्त लागलेला नाही.पावसाळ्यात शहरातील मळी भागातील नागरिकांना सर्वाधिक त्रासाचा सामना करावा लागतो. शहरातील लांडघोलमळा, चपाटे मळा, वडमळा, खानापुरे मळा, मिरजकर मळा, म्हेत्रे मळा, खाडेवाडीसह अनेक मळीभागात रस्त्यांची दुरवस्था आहे. नागरिकांकडून मुरुमीकरणाची मागणी होऊनदेखील पालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मळीभागात दलदलीचे साम्राज्य झाले आहे.अशा एक ना अनेक समस्यांचा सामना तासगावकरांना करावा लागत असताना, सत्ताधारी समस्या नामशेष करण्याऐवजी, पालिकेतील विरोधकांना नामशेष करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. केवळ कुरघोड्यांचे राजकारण करुन राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात सत्ताधारी कारभारी मश्गुल असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत, सत्तेत बसवलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांवर भरवसा राहिलाय का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.बेकायदा बांंधकामावर हातोडा केव्हा? भाजपचे पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका निर्मला पाटील यांचे बेकायदा बांधकाम असल्याने नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या नव्हे, तर शहरातील अनेक बड्या लोकांंनी पालिकेच्या अनेक मोक्याच्या जागांवर बेकायदा अतिक्रमण केले आहे. अशा जागा सत्ताधाऱ्यांना दिसत नाहीत का? असा सवालही उपस्थित होत आहे.