शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झंोपलेत काय?

By admin | Updated: June 13, 2016 00:07 IST

प्रतीक पाटील : सिंचन कार्यालय स्थलांतरित होणे ही नाचक्की

सांगली : कृष्णा-कोयना उपसा सिंचन मंडल कार्यालय बंद करून, ते यवतमाळ येथे स्थलांतरित करण्यात येणार असताना, सांगली जिल्ह्यातील सत्ताधारी भाजपचे आमदार, खासदार झोपलेत का?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्यातील दुष्काळी भागाला कृष्णेच्या पाण्याचे जीवनदायी वरदान मिळावे, म्हणून वसंतदादा पाटील यांनी या योजनेची निर्मिती केली होती. दुष्काळी भागासाठी वाढलेले मोकळे ताटही आता भाजप सरकारने काढून घेतले आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी भागाच्या योजना कायमस्वरुपी बंद करून केवळ विदर्भासाठी सिंचनाचे कार्यक्रम राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंचन योजनांची कार्यालयेच आता स्थलांतरित केली जात आहेत. म्हैसाळ, टेंभू योजना अद्याप अपूर्ण आहेत. या योजनांना अपेक्षित निधी देण्याचे सोडून सरकार या योजनाच गुंडाळत आहे. अशा परिस्थितीत दुष्काळी पे्रमाचा आव आणणारे सत्ताधारी आमदार, खासदार गप्प का आहेत? त्यांनी याप्रश्नी लक्ष घालून हा निर्णय हाणून पाडावा, अन्यथा ‘आमच्याकडून काहीही होणार नाही’, असे त्यांनी जाहीर करावे. आम्ही या प्रश्नावर आंदोलन करून सरकारला जेरीस आणू. केंद्र शासनाच्या वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रमांतर्गत (एआयबीपी) जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी मोठा निधी मंजूर झाला होता. खासदारांच्या दुर्लक्षामुळे योजनेचा पैसा मिळाला नाही. अन्य कोणत्याही योजनेतून निधी आणण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही. निधी नसल्याने आता योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. निधी आणण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी करायचे सोडून शासनाच्या प्रत्येक कृतीवर गप्प बसण्याची भूमिका स्वीकारली आहे. म्हैसाळ योजनेमधून १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे आवश्यक असताना, अपूर्ण कामामुळे ४९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखली आले आहे. कवठेमहांकाळ, जत, सोलापूर, मंगळवेढा परिसरातील सर्व कामे अपूर्ण आहेत. ‘ताकारी’साठी शासनाकडून ६00 कोटी निधी अपेक्षित आहे. या योजनेतून २७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यायला हवे होते. अपुऱ्या कामांमुळे केवळ १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)नेत्यांची हतबलता : आंदोलन उभारणारराज्यातील सिंचन योजनांच्या स्थलांतराबाबत इतका महत्त्वाचा निर्णय झाला तरी, भाजपचे आमदार, खासदार काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. इतके ते हतबल का आहेत? त्यांनी त्यांची हतबलता जाहीर करावी आणि आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतीक पाटील यांनी यावेळी केले.