शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

‘जिल्हा नियोजन’च्या शिल्लक निधी खर्चाचे ‘नियोजन’ काय?, हात आखडता घेणाऱ्या विभागावर लक्ष 

By शरद जाधव | Updated: April 10, 2023 13:51 IST

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्य

शरद जाधव सांगली : प्रशासनाची चांगलीच धाकधूक वाढविणारे यंदाचे आर्थिक वर्ष संपले आणि शासकीय विभागांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री उशिरापर्यंत थांबून तयार केलेले प्रस्ताव आणि त्यानुसार वळते झालेल्या निधीवर आता उड्या पडणार आहेत. मात्र, अनेक शासकीय विभागाला मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा हिस्सा मार्च एन्डनंतरही कायम असल्याने या शिल्लक निधीच्या खर्चाचे नियोजन काय असणार याकडे आता लक्ष असणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना निधीची तरतूद होते. यासाठी नियोजन समितीची सभा आणि पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यावर्षी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शासनाकडून जादा निधी मिळवून आणत दुर्लक्षित विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असलातरी निधी उपलब्ध असून खर्चात हात आखडता घेणाऱ्या विभागावर आता लक्ष असणार आहे.

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्यशासनाकडून उपलब्ध निधीचा विनियोग न केल्यास तो निधी परत शासनाकडे जाण्याची शक्यता असते. यासाठी मार्च महिन्यात नियोजन पूर्ण करण्यात येते. संपूर्ण महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आढावा घेऊन विनियोगाच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे आता शिल्लक निधी परत जाणार नाही याचे नियोजनही करावे लागणार आहे.

४१६ कोटींचा प्रारूप आराखडा

जिल्हा वार्षिक योजनेतून यंदा सर्वसाधारण क्षेत्रासाठी ३३१ कोटी ८२ लाख रुपये, अनुसूचित जाती घटकांसाठी ८३ कोटी ८१ लाख रुपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता एक कोटी एक लाख रुपये असे एकूण ४१६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर होता. त्यात ११२ कोटी ८४ लाख रुपये वाढीव निधी पालकमंत्र्यांनी मिळवला होता.

...या कामांना मिळणार गतीजिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमास विशेष प्राधान्य मिळणार आहे. यासाठी ३९ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासह मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्रणा, लम्पी आजार उपाययोजनेसाठीही निधी मिळाला आहे. जिल्हा परिषद शाळांसाठीही याद्वारे गती मिळणार आहे.

शंभर टक्के निधी खर्च न करणाऱ्यांचे काय?

अनेक शासकीय विभागांना चांगला निधी मिळत असलातरी, पूर्ण निधीचा वापर केला जात नाही. त्यामुळे निधी खर्च न करणाऱ्या विभागांबाबत पालकमंत्री काय निर्णय घेणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही अद्याप अनेक विभाग निरंकच आहेत.

टॅग्स :Sangliसांगली