शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

‘जिल्हा नियोजन’च्या शिल्लक निधी खर्चाचे ‘नियोजन’ काय?, हात आखडता घेणाऱ्या विभागावर लक्ष 

By शरद जाधव | Updated: April 10, 2023 13:51 IST

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्य

शरद जाधव सांगली : प्रशासनाची चांगलीच धाकधूक वाढविणारे यंदाचे आर्थिक वर्ष संपले आणि शासकीय विभागांनी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री उशिरापर्यंत थांबून तयार केलेले प्रस्ताव आणि त्यानुसार वळते झालेल्या निधीवर आता उड्या पडणार आहेत. मात्र, अनेक शासकीय विभागाला मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा हिस्सा मार्च एन्डनंतरही कायम असल्याने या शिल्लक निधीच्या खर्चाचे नियोजन काय असणार याकडे आता लक्ष असणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासकामांना निधीची तरतूद होते. यासाठी नियोजन समितीची सभा आणि पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. यावर्षी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी शासनाकडून जादा निधी मिळवून आणत दुर्लक्षित विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असलातरी निधी उपलब्ध असून खर्चात हात आखडता घेणाऱ्या विभागावर आता लक्ष असणार आहे.

निधी परत न जाण्यासाठी प्राधान्यशासनाकडून उपलब्ध निधीचा विनियोग न केल्यास तो निधी परत शासनाकडे जाण्याची शक्यता असते. यासाठी मार्च महिन्यात नियोजन पूर्ण करण्यात येते. संपूर्ण महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आढावा घेऊन विनियोगाच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे आता शिल्लक निधी परत जाणार नाही याचे नियोजनही करावे लागणार आहे.

४१६ कोटींचा प्रारूप आराखडा

जिल्हा वार्षिक योजनेतून यंदा सर्वसाधारण क्षेत्रासाठी ३३१ कोटी ८२ लाख रुपये, अनुसूचित जाती घटकांसाठी ८३ कोटी ८१ लाख रुपये व आदिवासी घटक कार्यक्रमाकरिता एक कोटी एक लाख रुपये असे एकूण ४१६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा मंजूर होता. त्यात ११२ कोटी ८४ लाख रुपये वाढीव निधी पालकमंत्र्यांनी मिळवला होता.

...या कामांना मिळणार गतीजिल्हा वार्षिक योजनेतून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमास विशेष प्राधान्य मिळणार आहे. यासाठी ३९ कोटी ६५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासह मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय यंत्रणा, लम्पी आजार उपाययोजनेसाठीही निधी मिळाला आहे. जिल्हा परिषद शाळांसाठीही याद्वारे गती मिळणार आहे.

शंभर टक्के निधी खर्च न करणाऱ्यांचे काय?

अनेक शासकीय विभागांना चांगला निधी मिळत असलातरी, पूर्ण निधीचा वापर केला जात नाही. त्यामुळे निधी खर्च न करणाऱ्या विभागांबाबत पालकमंत्री काय निर्णय घेणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करूनही अद्याप अनेक विभाग निरंकच आहेत.

टॅग्स :Sangliसांगली