शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न देणारे सरकार काय कामाचे?

By admin | Updated: October 9, 2014 23:39 IST

राजनाथसिंह : विट्यातील सभेत काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विटा : महाराष्ट्राचा विकास भाजपशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे केंद्रात भाजपकडे जशी एकहाती सत्ता दिली तशी महाराष्ट्रातही द्या, असे आवाहन करतानाच जे शेती व पिण्यास पाणी देऊ शकत नाहीत, ते सरकार काय कामाचे? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी विटा येथील कार्यक्रमात उपस्थित केला.विटा येथे आज गुरुवारी भाजपची प्रचारसभा पार पडली. राजनाथसिंह म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे गेली १५ वर्षे सरकार होते. परंतु, या सरकारने काय केले? आदर्श, सिंचन घोटाळ्यासह शेतकरी आत्महत्या आणि राज्यात सुमारे १ हजार ३६२ बलात्काराच्या घटना झाल्या तरी, महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असल्याचे सांगितले जाते. भाजपचे देशातील पाच राज्यात सरकार आहे. त्यांचीही कामे बघा. देशात भाजपचे बहुमताने सरकार स्थापन झाले. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधित पेट्रोल व डिझेलच्या किमती तीनवेळा कमी झाल्या. आणखीही पेट्रालचे दर कमी होणार आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते केवळ सत्तेसाठी व स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, आपण केंद्रात भाजपचे बहुमताने सरकार आणून कुर्ता चढविला, तसा महाराष्ट्रातही भाजपचे बहुमताने सरकार आणून पायजमा चढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अनिल म. बाबर यांनी केले. यावेळी गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, रूपाली मेटकरी, दिलीप आमणे, अ‍ॅड. विनोद गोसावी, तानाजी यमगर, कुमार लोटके, शुभांगी सुर्वे, विठ्ठलराव मोरे, बंडोपंत देशमुख, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. आभार कुमार लोटके यांनी मानले. (वार्ताहर)पाकिस्तानला इशारा...जत : पाकिस्तानकडून सीमारेषेचे वारंवार उल्लंघन होत आहे. परंतु, त्याला आपले जवान जशास तसे उत्तर देत आहेत. भारताची इंच न् इंच जमीन आपली आहे. त्यावर कोणी नजर ठेवत असले तर, त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. सैनिकच उत्तर देत असल्यामुळे आम्हाला परत यासंदर्भात उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे राजनाथसिंह यांनी जत येथील सभेत सांगितले. पाकिस्तानकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताची सुरक्षाव्यवस्था सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजयकाकांची गैरहजेरीया सभेस भाजपचे खा. संजयकाका पाटील आले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती सभास्थळी चर्चेचा विषय बनली होती.देशात सत्ता येऊन फक्त चार महिने झाले आहेत. या चार महिन्यांत वाढती महागाई कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर दर सतत कमी केले आहेत. खत सबसिडी अनुदान यापुढे थेट शेतकऱ्यांना देणार आहे; उद्योगपतींना देणार नाही, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जत येथे भाषणाची सुरुवात मराठीतून करताना, मी शुद्ध मराठी बोलू शकत नसलो, तरी समजू शकतो, असे सांगितले.