शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पाणी न देणारे सरकार काय कामाचे?

By admin | Updated: October 9, 2014 23:39 IST

राजनाथसिंह : विट्यातील सभेत काँग्रेस, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

विटा : महाराष्ट्राचा विकास भाजपशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे केंद्रात भाजपकडे जशी एकहाती सत्ता दिली तशी महाराष्ट्रातही द्या, असे आवाहन करतानाच जे शेती व पिण्यास पाणी देऊ शकत नाहीत, ते सरकार काय कामाचे? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी विटा येथील कार्यक्रमात उपस्थित केला.विटा येथे आज गुरुवारी भाजपची प्रचारसभा पार पडली. राजनाथसिंह म्हणाले, महाराष्ट्रात कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे गेली १५ वर्षे सरकार होते. परंतु, या सरकारने काय केले? आदर्श, सिंचन घोटाळ्यासह शेतकरी आत्महत्या आणि राज्यात सुमारे १ हजार ३६२ बलात्काराच्या घटना झाल्या तरी, महाराष्ट्र हा क्रमांक एकवर असल्याचे सांगितले जाते. भाजपचे देशातील पाच राज्यात सरकार आहे. त्यांचीही कामे बघा. देशात भाजपचे बहुमताने सरकार स्थापन झाले. त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधित पेट्रोल व डिझेलच्या किमती तीनवेळा कमी झाल्या. आणखीही पेट्रालचे दर कमी होणार आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते केवळ सत्तेसाठी व स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून, आपण केंद्रात भाजपचे बहुमताने सरकार आणून कुर्ता चढविला, तसा महाराष्ट्रातही भाजपचे बहुमताने सरकार आणून पायजमा चढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक नगरसेवक अनिल म. बाबर यांनी केले. यावेळी गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, रूपाली मेटकरी, दिलीप आमणे, अ‍ॅड. विनोद गोसावी, तानाजी यमगर, कुमार लोटके, शुभांगी सुर्वे, विठ्ठलराव मोरे, बंडोपंत देशमुख, बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. आभार कुमार लोटके यांनी मानले. (वार्ताहर)पाकिस्तानला इशारा...जत : पाकिस्तानकडून सीमारेषेचे वारंवार उल्लंघन होत आहे. परंतु, त्याला आपले जवान जशास तसे उत्तर देत आहेत. भारताची इंच न् इंच जमीन आपली आहे. त्यावर कोणी नजर ठेवत असले तर, त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल. सैनिकच उत्तर देत असल्यामुळे आम्हाला परत यासंदर्भात उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे राजनाथसिंह यांनी जत येथील सभेत सांगितले. पाकिस्तानकडून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारताची सुरक्षाव्यवस्था सक्षम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संजयकाकांची गैरहजेरीया सभेस भाजपचे खा. संजयकाका पाटील आले नाहीत. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती सभास्थळी चर्चेचा विषय बनली होती.देशात सत्ता येऊन फक्त चार महिने झाले आहेत. या चार महिन्यांत वाढती महागाई कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर दर सतत कमी केले आहेत. खत सबसिडी अनुदान यापुढे थेट शेतकऱ्यांना देणार आहे; उद्योगपतींना देणार नाही, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जत येथे भाषणाची सुरुवात मराठीतून करताना, मी शुद्ध मराठी बोलू शकत नसलो, तरी समजू शकतो, असे सांगितले.