शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सभागृहाच्या नामांतरावर मतभेद का?

By admin | Updated: September 22, 2015 23:50 IST

वाळवा पंचायत समिती : राष्ट्रवादीचा काँग्रेससह विरोधकांना सवाल

अशोक पाटील -इस्लामपूर -वाळवा पंचायत समितीच्या आवारातील जुनी इमारत जमीनदोस्त होणार आहे. त्याच इमारतीमधील वसंतदादा यांचे नाव असलेले सभागृहही पाडले जाणार आहे, तर नवीन इमारतीमधील सभागृहाला राजारामबापू यांचे नाव देण्याचे सत्ताधारी राष्ट्रवादीने निश्चित केले आहे. याला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. वसंतदादांचा आदर करणारे नेते आजही काँग्रेससह राष्ट्रवादीमध्ये आहेत. परंतु दादांच्याच वारसदारांनी त्यांनी स्थापन केलेल्या संस्था मोडीत काढल्या आहेत. याचे ज्वलंत उदाहरण असताना, वाळवेकरांना वसंतदादांच्या नावाचा अट्टाहास का, असा प्रतिसवाल राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारला आहे.पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादीचे सभापती रवींद्र बर्डे आणि त्यांचे सदस्य ठाम आहेत; तर काँग्रेसचे सदस्य प्रकाश पाटील यांनी पूर्वीचेच वसंतदादांचे नाव कायम ठेवण्याची मागणी केली आहे. याला जिल्हा परिषदेच्या तीन माजी सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दादा-बापू समर्थकांतील वाद पेटला आहे. यावर विरोधी पक्ष आणि इतर मोठे नेते भाष्य करत नाहीत.राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आपले नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेसच्या नेत्यांना प्रतिसवाल केले आहेत. वसंतदादांचे कार्य मोठे आहे. त्यांनी आशिया खंडात सर्वात मोठा साखर कारखाना उभा केला. तो त्यांच्या वारसदारांनी मोडीत काढला आहे. त्यांच्याच नावाची असलेली सहकारी बँक बुडाली आहे. राज्यात त्यांच्या नावे असलेल्या सहकारी संस्थांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची बदनामीच होत चालली आहे. याउलट वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सुरू केलेल्या संस्थांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आर्थिक संस्थांनीही घोडदौड करत राज्यभर विस्तार केला आहे. शिक्षण संस्थांचे नावही राज्यभर गाजले आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील पंचायत समिती सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्यात काहीच गैर नसल्याचेही सांगण्यात आले.वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्था राज्यात अग्रेसर आहेत. या सर्वच संस्थांमधून हजारो हातांना काम मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळावा म्हणून सर्व सहकारी संस्था उभ्या करण्यात बापूंचे योगदान आहे. तालुक्यातील इंचन इंच जमीन ओलिताखाली येण्यासाठी त्यांनी पाणी परवाने काढले नसते, तर आजचे वाळवा तालुक्याचे चित्र वेगळे असते. त्यामुळे वाळवा तालुक्यातील सर्वच संस्थांना त्यांचे नाव दिले तर यात गैर ते काय?- विनायकराव पाटील, अध्यक्ष राजारामबापू दूध संघ.विलासराव शिंदे यांचे मौनवाळवा पंचायत समिती सभागृहाच्या नावाचा वाद तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. १९८० मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांनी जनता पक्षातून वाळवा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तर वसंतदादांच्या ताकदीवर विलासराव शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर बापूंचा पराभव केला होता. तेच विलासराव शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी या नामांतराबाबत मौन पाळणे पसंद केले आहे.