शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

मिरज पूर्वमध्ये विहिरींनी तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2015 00:10 IST

नळ पाणी पुरवठ्यावर परिणाम : तलाव, पाणीसाठे भरून देण्याची मागणी

प्रवीण जगताप - लिंगनूर  मिरज पूर्व भागातील बेळंकी, लिंगनूर, खटाव या गावांतील नळांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. खालावलेल्या पाणी पातळीमुळे नियमित नळाचे पाणी मिळण्यास ‘ब्रेक’ बसू लागला आहे. बेळंकी येथील दोन्ही पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी पातळी घटली आहे. महिन्याभरापासून विस्कळीत व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे भागातील महिला व सामान्य जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू झाले आहेत. येथे चार-पाच दिवसांनंतर पाणी मिळत आहे, तर लिंगनूरचा मुख्य तलाव आटल्याने त्याखालील नळ पाणीपुरवठ्याच्या लिंगनूर व खटावच्या विहिरींचीही पाणी पातळी घटली आहे. सध्या या विहिरीत असणारे पाणी गाळाचे आहे व ते पिण्यायोग्य नाही. यंदा प्रथमच लिंगनूरमध्ये आठवड्यात दोन दिवस व पुन्हा रविवारी पाणी पुरवठा अपुरा झाला आहे.तसेच लिंगनूर येथील यल्लम्मा मंदिर परिसरातील विहिरींचे पाणीही संपले आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठल्यामुळे कधी नव्हे ते पहिल्यांदाच येथील नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा अडचणीत आला आहे. विहिरीतील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे गावातील नळांनाही अपुरा पाणीपुरवठा होऊ लागला आहे. आठवड्यापासून कालव्या-उपकालव्यांतून म्हैसाळचे पाणी वाहू लागले आहे. वीज पडून म्हैसाळच्या युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन दिवस योजना दुरूस्तीच्या कामात बंद झाली होती. मात्र आज पुन्हा योजना कार्यान्वित झाली आहे. या पाण्याचा अप्रत्यक्षरित्या लिंगनूर, बेळंकी येथील नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी कितपत फायदा होतो, याकडेही जनतेचे लक्ष आहे.लिंगनूर मुख्य तलावात ‘म्हैसाळ’चे पाणी कधी? अशात लिंगनूर येथील मुख्य तलावावर कार्यरत असणाऱ्या काडदेव पाणी वापर संस्थेने काही प्रमाणात पाणीपट्टी जमा करून म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तलाव भरून घेतल्यास आपोआपच त्याखाली असणाऱ्या व लिंगनूर गावाला नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी आपोआप वाढणार आहे. खालावलेल्या पाणी पातळीचा खटाव गावाच्या विहिरीसही फटका बसला आहे. त्यामुळे या तलावात म्हैसाळचे पाणी कधी दाखल होणार, याकडे परिसराचे लक्ष आहे.मोटारी जोडणाऱ्यांचा फटका सामान्यांनाएकीकडे पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकला असताना नळाचे पाणी सोडल्यानंतर काही ग्राहकांकडून विद्युत मोटारी जोडून पाणी खेचले जात असल्याने सामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, त्यात मोटारी लावून पाणी घेतल्याने इतर नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळेनासे झाले आहे. याचा विचार करून एक तर मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे अथवा पाण्याचा साठा कमी असेल, टाकीत पाणीसाठा कमी असेल, तर किमान नळाला पाणी सोडण्याअगोदर विद्युत मंडळाशी संपर्क करून त्या अर्ध्या तासापुरता गावातील विद्युतपुरवठा सकाळी बंद केला पाहिजे. यामुळे जर ग्राहक विद्युत मोटार जोडून पाणी उपसत असल्यास त्याला आपोआप आळा बसेल व सर्वांना समान क्षमतेने पाणी मिळेल, अशी मागणी सर्वसामान्य लोकांतून होत आहे.म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरातून पुढे यल्लम्मा मंदिरापर्यंत पोहोचल्यास येथील विहिरीचे पाणी वाढणार आहे. त्यामुळे ही विहीर भरल्यानंतर लिंगनूरचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. दोन्ही विहिरीत पाणीच नसल्याने आठवड्यातून तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा झाला आहे. परंतु म्हैसाळ योजनेचे पाणी सोनुरे तलाव परिसरात आज पोहोचले आहे. उद्याअखेर ते यल्लम्मा मंदिर परिसरात पोहोचेल, त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत करता येईल - मारूती पाटील, उपसरपंच, लिंगनूर