शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

व्यापारावरील निर्बंध १२ जुलैनंतर शिथील करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST

सांगली : सध्या महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७ ते २० टक्क्यांच्या घरात असल्याने निर्बंध कायम केले आहेत. येत्या १२ ...

सांगली : सध्या महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी रेट १७ ते २० टक्क्यांच्या घरात असल्याने निर्बंध कायम केले आहेत. येत्या १२ जुलैपासून तिसऱ्या स्तरातील सवलती व्यापारासाठी देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यापाऱ्यांना दिले. या आश्वासनानंतर दुकाने उघडण्याचे आंदोलन स्थगित केल्याची माहिती व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिली.

जिल्हाधिकारी आणि व्यापारी एकता असोसिएशनची बैठक शनिवारी झाली. सातत्याने बदलणारे नियम आणि लॉकडाऊनला कंटाळून असोसिएशनने आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने चर्चेसाठी व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार दोन आठवड्यांचे प्रमाण काढले तरी जिल्हा अद्याप स्तर ३ मध्ये येण्यास पात्र नाही. शहरी विभागातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर १७ ते २० टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे तोसुद्धा प्रयत्न करता येत नाही. कोणतीही शिथिलता द्यायची असेल, तर हे सगळे शासनाला कळवून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत ही स्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत कोणतीही मुभा देता येत नाही.

असोसिएशनतर्फे समीर शहा व अन्य सदस्यांनी अडचणी व आतापर्यंत केलेले सहकार्य याचा पाढा वाचला. प्रशासन जर सवलत देणार नसेल तर व्यापारीसुद्धा आता थांबू शकत नाहीत, अशी भूमिका घेतली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या १२ जुलैपासून सर्व निर्बंध उठवून स्तर तीनच्या सुविधा देण्यात येतील, असे आश्वासन दिले. ते म्हणाले की, सवलतींबाबतचे आदेश हे गुरुवारी किंवा शुक्रवारी काढण्यात येतील. त्यासाठी या आठवड्यात प्रशासन जिल्हा स्तर ३ मध्ये येण्यास युद्धपातळीवर प्रयत्न करेल. त्यानंतर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत.

समीर शहा यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन दुकाने सुरू करण्याबाबत सकारात्मक आहे. नुकसानाची बाजू त्यांना समजत आहे. दुकाने बंद असल्याबाबत प्रशासनालासुद्धा वाईट वाटत आहे. जे लोक अत्यावश्यक सेवेत आहेत, त्यांनीही सेवेत नसणारी दुकाने सुरू होण्यासाठी सहकार्याची भूमिका व प्रयत्न ठेवावेत, असे आवाहन आम्ही असोसिएशनतर्फे करत आहोत.

चौकट

नागरिकांनीही संयम पाळावा

नागरिकांनीही अनावश्यक गर्दी करणे टाळले पाहिजे. दुकाने सातत्याने बंद राहिल्याने व्यापारी समाज मोठ्या संकटात आहे. त्यामुळे विनाकारण फिरुन रुग्णसंख्या वाढवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत. प्रशासनाला आतापर्यंत केलेले सहकार्य वाया जाऊ नये म्हणून असोसिएशनने आंदोलन स्थगित केले आहे.