शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळच्या पाटात श्रेयवादाची लाट : जनता संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:28 IST

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला ...

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.

म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ते आजपर्यंत काय सुटलेले नाही. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत हे दुष्काळी तालुके या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राखाली येतात. यावर्षी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे व सोडल्याचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागलेली संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. खासदार संजयकाका पाटील यांनी या पाण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली. पाणी सोडले नाही तर, आपण राजीनामा देऊ, असे जाहीर केले. यासाठी त्यांनी दोन दिवस मुंबापुरीत फडणवीससाहेबांच्या दरबारात तळ ठोकला.

फडणवीसांच्या दरबारातील जलदेव गिरीश महाजन यांचीही मनधरणी करून काम फत्ते केल्याचे खा. संजयकाकांनी तातडीने जिल्ह्यात निरोप धाडले आणि सोशल मीडियात खा. संजयकाका म्हैसाळच्या पाटातून मिरजपूर्व ते कवठेमहांकाळ व्हाया जत असे वाहण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली.गेले दोन महिने या पाण्यासाठी कोण काय करतं याकडे जनताही लक्ष ठेवून आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे हे नेतेही खा. संजयकाका यांच्या हालचालींवर टेहळणी करीत होते. यामधील आ. सुरेश खाडे यांनी भाजप पक्षीय असल्याने खा. पाटील यांच्यासमवेतच या पाटात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.

अजितराव घोरपडे आणि आ. सुमनताई पाटील यांनी याचे श्रेय खा. संजयकाका पाटील यांच्याकडे जाऊ नये म्हणून थेट मुंबापुरी गाठून जलदेव गिरीश महाजन यांची भेट घेतली व पाणी सोडण्यासाठी लेखी मागणी केली. त्याचे फोटोही वाºयासारखे खा. पाटील सांगलीत दाखल व्हायच्या आधी व्हायरल करण्यात आले आणि पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनता मोठ्या बुचकळ्यात पडली.म्हैसाळचे पाणी प्रभावी हत्यारआता कुणाचे नाव घ्यायचे म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. त्याच्या आधी जनतेसमोर जाण्यासाठी म्हैसाळचे पाणी हे प्रभावी हत्यार म्हणून वापरता यावे यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे जनता उघड बोलू लागली आहे.