शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

म्हैसाळच्या पाटात श्रेयवादाची लाट : जनता संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:28 IST

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला ...

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला

अर्जुन कर्पे।कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.

म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ते आजपर्यंत काय सुटलेले नाही. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत हे दुष्काळी तालुके या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राखाली येतात. यावर्षी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे व सोडल्याचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागलेली संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. खासदार संजयकाका पाटील यांनी या पाण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली. पाणी सोडले नाही तर, आपण राजीनामा देऊ, असे जाहीर केले. यासाठी त्यांनी दोन दिवस मुंबापुरीत फडणवीससाहेबांच्या दरबारात तळ ठोकला.

फडणवीसांच्या दरबारातील जलदेव गिरीश महाजन यांचीही मनधरणी करून काम फत्ते केल्याचे खा. संजयकाकांनी तातडीने जिल्ह्यात निरोप धाडले आणि सोशल मीडियात खा. संजयकाका म्हैसाळच्या पाटातून मिरजपूर्व ते कवठेमहांकाळ व्हाया जत असे वाहण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली.गेले दोन महिने या पाण्यासाठी कोण काय करतं याकडे जनताही लक्ष ठेवून आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे हे नेतेही खा. संजयकाका यांच्या हालचालींवर टेहळणी करीत होते. यामधील आ. सुरेश खाडे यांनी भाजप पक्षीय असल्याने खा. पाटील यांच्यासमवेतच या पाटात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.

अजितराव घोरपडे आणि आ. सुमनताई पाटील यांनी याचे श्रेय खा. संजयकाका पाटील यांच्याकडे जाऊ नये म्हणून थेट मुंबापुरी गाठून जलदेव गिरीश महाजन यांची भेट घेतली व पाणी सोडण्यासाठी लेखी मागणी केली. त्याचे फोटोही वाºयासारखे खा. पाटील सांगलीत दाखल व्हायच्या आधी व्हायरल करण्यात आले आणि पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनता मोठ्या बुचकळ्यात पडली.म्हैसाळचे पाणी प्रभावी हत्यारआता कुणाचे नाव घ्यायचे म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. त्याच्या आधी जनतेसमोर जाण्यासाठी म्हैसाळचे पाणी हे प्रभावी हत्यार म्हणून वापरता यावे यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे जनता उघड बोलू लागली आहे.