शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: April 18, 2015 00:08 IST

उन्हा-तान्हात पायपीट : प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास चालढकल

संख : कोरड्या पडलेल्या कूपनलिका, कमी झालेली पाण्याची पातळी, अत्यल्प पडलेला पाऊस, वाढत्या उन्हाची तीव्रता, रिमझिम अवकाळी पाऊस, तसेच कायमस्वरूपी नळपाणी योजनांच्या अभावामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील १७ गावांत व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही गावांतील वाड्या-वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांना उन्हा-तान्हात हंडा, घागर घेऊन पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, उमराणी येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व जिल्ह्यातील हा पहिला पाणी टॅँकर आहे.तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेले होते. मात्र यावर्षी जून महिन्यापासून पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली होती. एकूण ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची पातळी १.५७ मीटरने वाढली होती. परंतु भूभाग अच्छिद्र स्वरुपाचा खडक असल्याने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही. पाण्याचा उपसाही अवाजवी झाला आहे. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी, कूपनलिका, साठवण तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. तालुक्यात संख व दोड्डनाला हे मध्यम प्रकल्प असून २६ तलाव आहेत. दोन्ही मध्यम प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. २६ तलावांपैकी खोजानवाडी, दरीबडची, बेळुुंखी, उमराणी हे ४ तलाव कोरडे पडले आहेत. सिद्धनाथ, सोरडी, गुगवाड, मिरवाड, तिकोंडी १ व २, डफळापूर, बिळूर या ८ तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. मागील तीन महिन्यात उर्वरित तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जत पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी आल्याने हा भाग वगळता जत पूर्व, दक्षिण व उत्तर भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील खोजानवाडी, कुडनूर, उमदी, बेळुंखी, अंकलगी, उमराणी, वज्रवाड, मुचंडी, हळ्ळी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माडग्याळ, गुड्डापूर, वळसंग, सनमडी, कुणीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची) या १८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याखालील वाड्या-वस्तीवर पाणीटंचाईची भीषणता अधिक आहे. ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे.प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून खोजानवाडी येथील कूपनलिका अधिग्रहण करून तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. दोड्डनाला, भिवर्गी प्रकल्पासह अंकलगी, संख तलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वीच उपसाबंदी लागू केली. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. उमदी, संख, माडग्याळ, बेळुुंखी, बालगाव, अंकलगी आदी गावात नळ पाणीपुरवठा योजनांतून पाणी मिळते. त्याखालील वाड्या-वस्तीवर गेल्या दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी माडग्याळ येथील पाण्याची पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी टॅँकर सुरू करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.