शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: April 18, 2015 00:08 IST

उन्हा-तान्हात पायपीट : प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास चालढकल

संख : कोरड्या पडलेल्या कूपनलिका, कमी झालेली पाण्याची पातळी, अत्यल्प पडलेला पाऊस, वाढत्या उन्हाची तीव्रता, रिमझिम अवकाळी पाऊस, तसेच कायमस्वरूपी नळपाणी योजनांच्या अभावामुळे कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील १७ गावांत व त्याखालील वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. काही गावांतील वाड्या-वस्तीवर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शाळकरी मुलांना उन्हा-तान्हात हंडा, घागर घेऊन पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, उमराणी येथे टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे व जिल्ह्यातील हा पहिला पाणी टॅँकर आहे.तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेले होते. मात्र यावर्षी जून महिन्यापासून पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली होती. एकूण ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याची पातळी १.५७ मीटरने वाढली होती. परंतु भूभाग अच्छिद्र स्वरुपाचा खडक असल्याने पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही. पाण्याचा उपसाही अवाजवी झाला आहे. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी, कूपनलिका, साठवण तलावातील पाण्याची पातळी घटली आहे. तालुक्यात संख व दोड्डनाला हे मध्यम प्रकल्प असून २६ तलाव आहेत. दोन्ही मध्यम प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा मृतसंचयाखाली आहे. २६ तलावांपैकी खोजानवाडी, दरीबडची, बेळुुंखी, उमराणी हे ४ तलाव कोरडे पडले आहेत. सिद्धनाथ, सोरडी, गुगवाड, मिरवाड, तिकोंडी १ व २, डफळापूर, बिळूर या ८ तलावांतील पाणीसाठा मृत संचयाखाली आहे. मागील तीन महिन्यात उर्वरित तलावांतील पाणीसाठा कमी झाल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जत पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी आल्याने हा भाग वगळता जत पूर्व, दक्षिण व उत्तर भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तालुक्यातील खोजानवाडी, कुडनूर, उमदी, बेळुंखी, अंकलगी, उमराणी, वज्रवाड, मुचंडी, हळ्ळी, बेळोंडगी, बालगाव, करजगी, माडग्याळ, गुड्डापूर, वळसंग, सनमडी, कुणीकोणूर, लमाणतांडा (दरीबडची) या १८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याखालील वाड्या-वस्तीवर पाणीटंचाईची भीषणता अधिक आहे. ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे.प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना म्हणून खोजानवाडी येथील कूपनलिका अधिग्रहण करून तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. दोड्डनाला, भिवर्गी प्रकल्पासह अंकलगी, संख तलावासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांपूर्वीच उपसाबंदी लागू केली. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. उमदी, संख, माडग्याळ, बेळुुंखी, बालगाव, अंकलगी आदी गावात नळ पाणीपुरवठा योजनांतून पाणी मिळते. त्याखालील वाड्या-वस्तीवर गेल्या दीड महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी माडग्याळ येथील पाण्याची पाहणी केली आहे. ग्रामस्थांनी टॅँकर सुरू करण्याची मागणी केली, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.