शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

‘टेंभू’चे पाणी २५ ला अर्जुनवाडीत भारत पाटणकर : पाणीपट्टीतून वीज बिलाचा खर्च वसुलीस स्थगिती

By admin | Updated: May 14, 2014 00:07 IST

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी २५ मे २०१४ पर्यंत आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी तलावात पाणी सोडून सांगोला तालुक्यातील बुधीहाळ तलावात सोडण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. तसेच ते म्हणाले की, वीज बिलाचा खर्च दुरुस्ती व देखभाल खर्च म्हणून धरला जाईल. वीजबिल पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आटपाडीत पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू योजनेतून पाणी सोडण्याबाबत सांगलीतील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली. यावेळी अधीक्षक राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, पाणी चळवळीतील आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, शेख, संतोष गोठल, महादेव देशमुख, मनोहर विभुते आदी उपस्थित होते. अर्जुनवाडी तलावात पाणी सोडण्याच्यादृष्टीने टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना शेतकरी मदत करणार आहेत. श्रमदानातून शेतकरी पोटकालव्याची किरकोळ खुदाई असेल ती करून पाण्याचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विहिरी, तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. पाणी सोडण्यापूर्वी मोजमापन पध्दतीने शेतकरी अधिकार्‍यांकडे पाणीपट्टीही भरणार आहेत. अर्जुनवाडी तलावात पाणी आल्यानंतर आटपाडी तालुक्यातील ७५ टक्के भागाला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. निधी कमी पडत असेल, तर शासनाविरोधात लढा उभारून तो मिळविण्यात येईल, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पाणीपट्टी आकारणी झाल्यानंतर वीज बिलाचे पैसेही शेतकर्‍यांकडून वसूल केले जात होते. याविरोधात आम्ही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे अध्यक्ष पुदीराजा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार पुदीराजा यांनी वीज बिल हे दुरुस्ती व देखभाल खर्चाचा भाग म्हणून धरण्याची सूचना दिली आहे. तसे लेखी पत्र मागील आठवड्यात मिळाले आहे. (प्रतिनिधी)