शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’चे पाणी २५ ला अर्जुनवाडीत भारत पाटणकर : पाणीपट्टीतून वीज बिलाचा खर्च वसुलीस स्थगिती

By admin | Updated: May 14, 2014 00:07 IST

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी २५ मे २०१४ पर्यंत आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी तलावात पाणी सोडून सांगोला तालुक्यातील बुधीहाळ तलावात सोडण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. तसेच ते म्हणाले की, वीज बिलाचा खर्च दुरुस्ती व देखभाल खर्च म्हणून धरला जाईल. वीजबिल पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकर्‍यांकडून वसूल करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आटपाडीत पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू योजनेतून पाणी सोडण्याबाबत सांगलीतील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली. यावेळी अधीक्षक राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, पाणी चळवळीतील आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, शेख, संतोष गोठल, महादेव देशमुख, मनोहर विभुते आदी उपस्थित होते. अर्जुनवाडी तलावात पाणी सोडण्याच्यादृष्टीने टेंभू योजनेच्या अधिकार्‍यांना शेतकरी मदत करणार आहेत. श्रमदानातून शेतकरी पोटकालव्याची किरकोळ खुदाई असेल ती करून पाण्याचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विहिरी, तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. पाणी सोडण्यापूर्वी मोजमापन पध्दतीने शेतकरी अधिकार्‍यांकडे पाणीपट्टीही भरणार आहेत. अर्जुनवाडी तलावात पाणी आल्यानंतर आटपाडी तालुक्यातील ७५ टक्के भागाला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. निधी कमी पडत असेल, तर शासनाविरोधात लढा उभारून तो मिळविण्यात येईल, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पाणीपट्टी आकारणी झाल्यानंतर वीज बिलाचे पैसेही शेतकर्‍यांकडून वसूल केले जात होते. याविरोधात आम्ही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे अध्यक्ष पुदीराजा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार पुदीराजा यांनी वीज बिल हे दुरुस्ती व देखभाल खर्चाचा भाग म्हणून धरण्याची सूचना दिली आहे. तसे लेखी पत्र मागील आठवड्यात मिळाले आहे. (प्रतिनिधी)