शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
2
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
3
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
4
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
5
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
6
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
7
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
8
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
9
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
10
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
11
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
12
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
13
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
16
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
17
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
18
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
19
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
20
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेचे पाणी चालले वाया

By admin | Updated: July 16, 2014 00:01 IST

नियोजनाचा अभाव : ओढे-नाले तुडुंब भरले

प्रताप महाडिक - कडेगावपाणी काटकसरीने वापरण्याचा विचारच नुसता पुढे धावतो आहे, परंतु आचार मागे रेंगाळतो आहे. ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नियोजनाचा अभाव, शेतकऱ्यांत पाणी वापराबद्दल नसलेली जागरुकता, जलवाहिन्यांची गळती, निधीअभावी खोळंबलेली कामे यामुळे ताकारीच्या पाण्याचा प्रचंड अपव्यय होत आहे. योजनेच्या लाभक्षेत्रात नेहमीच ओढ्या-नाल्यांतून पाणी धो—धो वहात असते. योजनेच्या २७ हजार हेक्टर लाभक्षेत्रासाठी ९ टीएमसी पाणी राखून ठेवले जाते. मात्र मागील वर्षी ९ टीएमसीपेक्षा जादा पाणी उचलले आहे. तरीही केवळ ६ हजार हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली आल्याची नोंद आहे.ताकारी योजनेचा मुख्य कालवा १८२ कि.मी. लांबीचा आहे. या कालव्याला असलेल्या पोटपाटांची लांबी अंदाजे ४00 कि.मी.पर्यंत आहे. यातून परिसरातील २७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ९ टीएमसीहून अधिक पाणी राखून ठेवले आहे.सुरुवातीला १९८४ मध्ये ८४ कोटींचे बजेट ठरणारी ही योजना हजार कोटींच्या घरात गेली, तरी योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. योजनेचे काम अपूर्ण असतानाही युती शासनाच्या काळात योजनेतून पाणी उचलण्यात आले. याच काळात योजनेचे काम जोमाने करण्यात आले. आता केंद्र शासनाच्या एआयबीपीत योजनेचा समावेश होऊनही, त्या पटीत निधी मिळाला नसल्याचे दिसून येते. निधीअभावी बरीचशी कामे खोळंबली आहेत. यात प्रामुख्याने मुख्य कालव्याला अस्तरीकरण करणे, पोटपाटाची अपुरी असणारी कामे पूर्ण करून अस्तरीकरण करणे, पोटपाटांवर मीटर बसविणे यासारख्या कामांचा समावेश आहे.सध्या ताकारीचे पाणी १00 कि.मी.पर्यंत पोहोचले आहे. यातून कडेगाव, खानापूर आणि तासगाव तालुक्यातील बहुतांशी भाग पाण्याखाली आला आहे. मुख्य कालव्यासह वितरिकांना अस्तरीकरण नसल्यामुळे जागोजागी पोटपाट फोडून शेतकऱ्यांनी पाणी ओढ्या-नाल्यात सोडले आहे. अनेक ठिकाणी योजना सुरू झाल्यापासून मोकळ्या रानात पाणी सुरू असते. त्यामुळे पाण्याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच अधिक होत आहे. थेट शेतकऱ्यांना बांधापर्यंत पाणी वाटप करण्यासाठी योजनेच्या कार्यालयात विशेष कर्मचाऱ्यांची तरतूद आहे. मात्र गेली अनेक वर्षे या जागा रिक्तच आहेत. योग्य पाणीवाटप करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.योजनेच्या अधिकाऱ्यांसमोर अपुरी कामे पूर्ण करण्याबरोबरच योग्य नियोजन करण्याची जबाबदारी आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक संघटना, शाळा, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.