शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी ...

ठळक मुद्देसंजयकाका पाटील यांच्याहस्ते कळ दाबून उद्घाटन, पंधरा कोटी रुपये प्राप्त

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.

खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी व भाजप, काँग्रेस पदाधिकाºयांनी नारळ फोडले. म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. मला राजकीय श्रेय घ्यायचे नाही; मात्र थकीत वीज बिलासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, असे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणाला बगल देऊन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खा. पाटील यांनी केले. म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल आ. खाडे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे अभिनंदन केले. ८१-१९ या नवीन फॉर्म्युल्यामुळे यापुढे म्हैसाळ योजना सक्षमपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये रक्कम शुक्रवारी महावितरणकडे वर्ग झाल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू होऊन आज पहिल्या टप्प्यातील दोन पंप सुरू करण्यात आले. रखडलेले म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. थकीत वीजबिलापोटी म्हैसाळचे आवर्तन रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी ने व सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने संजयकाका पाटील व आ. खाडे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला.

गतवर्षी आॅगस्ट महिन्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील दोन पंप आज सुरू करण्यात आले असून, उद्यापर्यंत आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आवर्तन सुरू झाल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण राजमाने, मोहन वनखंडे, मकरंद देशपांडे, परशुराम नागरगोजे, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, दिलीप पाटील, किरण बंडगर, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे यांच्यासह म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, सूर्यकांत नलवडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.राजकीय कळ : दोन नेत्यांत जुंपलीआवर्तनाच्या प्रारंभालाच उपस्थितीवरून भाजप आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉँग्रेस नेते अनिल आमटवणे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात पुढे जाण्याच्या कारणावरून जोरदार वादावादी व परस्परांना शिवीगाळ झाली. आमटवणे व भोसले यांनी एकमेकाला बघून घेण्याचा इशारा दिला. खा. संजय पाटील यांनी मध्यस्थी करून आमटवणे यांच्या हस्ते नारळ फोडला. अनिल आमटवणे, तानाजी पाटील, वसंत गायकवाड या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खा. संजयकाका पाटील यांचे कौतुक करीत आ. सुरेश खाडे यांच्यावर टीका केली.