शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

म्हैसाळ योजनेतून अखेर पाणी सुरू : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:23 IST

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी ...

ठळक मुद्देसंजयकाका पाटील यांच्याहस्ते कळ दाबून उद्घाटन, पंधरा कोटी रुपये प्राप्त

मिरज : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे खा. संजयकाका पाटील यांनी कळ दाबून पाणी सुरू केले. सहा महिन्यानंतर म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजप पदाधिकाºयांत वादावादीचा प्रकार घडला.

खा. संजयकाका पाटील यांनी शनिवारी म्हैसाळ पंपगृहात कळ दाबून योजनेचे पाणी सुरू केले. शेतकरी व भाजप, काँग्रेस पदाधिकाºयांनी नारळ फोडले. म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. मला राजकीय श्रेय घ्यायचे नाही; मात्र थकीत वीज बिलासाठी शासनाने निधी द्यावा यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता, असे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकारणाला बगल देऊन सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खा. पाटील यांनी केले. म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याबद्दल आ. खाडे यांनी मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे अभिनंदन केले. ८१-१९ या नवीन फॉर्म्युल्यामुळे यापुढे म्हैसाळ योजना सक्षमपणे सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.

म्हैसाळ योजनेसाठी १५ कोटी रुपये रक्कम शुक्रवारी महावितरणकडे वर्ग झाल्यानंतर विद्युतपुरवठा सुरू होऊन आज पहिल्या टप्प्यातील दोन पंप सुरू करण्यात आले. रखडलेले म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. थकीत वीजबिलापोटी म्हैसाळचे आवर्तन रखडल्याने शेतकरी हवालदिल होते. म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी ने व सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. टंचाई निधीतून थकीत वीजबिल भरून म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबाबत लवकर निर्णय होत नसल्याने संजयकाका पाटील व आ. खाडे यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला.

गतवर्षी आॅगस्ट महिन्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात म्हैसाळचे आवर्तन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील दोन पंप आज सुरू करण्यात आले असून, उद्यापर्यंत आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हैसाळचे आवर्तन सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. आवर्तन सुरू झाल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायतक्षेत्र अवलंबून असलेल्या शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती अरुण राजमाने, मोहन वनखंडे, मकरंद देशपांडे, परशुराम नागरगोजे, एस. आर. पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल सकळे, दिलीप पाटील, किरण बंडगर, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे यांच्यासह म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, सूर्यकांत नलवडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.राजकीय कळ : दोन नेत्यांत जुंपलीआवर्तनाच्या प्रारंभालाच उपस्थितीवरून भाजप आणि कॉँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉँग्रेस नेते अनिल आमटवणे आणि भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात पुढे जाण्याच्या कारणावरून जोरदार वादावादी व परस्परांना शिवीगाळ झाली. आमटवणे व भोसले यांनी एकमेकाला बघून घेण्याचा इशारा दिला. खा. संजय पाटील यांनी मध्यस्थी करून आमटवणे यांच्या हस्ते नारळ फोडला. अनिल आमटवणे, तानाजी पाटील, वसंत गायकवाड या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी खा. संजयकाका पाटील यांचे कौतुक करीत आ. सुरेश खाडे यांच्यावर टीका केली.