शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विट्यात दररोज २० लाखांच्या कापड उत्पादनावर पाणी--वीज भारनियमनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:16 IST

दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणारअसून, शहरातील दोन ...

ठळक मुद्दे कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास भारनियमनात शहरातील ६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार

दिलीप मोहिते/विटा : महावितरणने विटा शहरात दररोज सरासरी साडेतीन तास वीजभारनियमन निश्चित केले असून, या भारनियमनाचा सर्वाधिक फटकावस्त्रोद्योगाला बसणार आहे. या साडेतीन तासांच्या भारनियमनात शहरातील६००० यंत्रमागांचे प्रतिदिन ७५ हजार कापड उत्पादन थांबणार असून, सुमारे२० लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे.दरम्यान, याचा फटका यंत्रमागावर काम करणाºया कामगारांनाही सोसावा लागणारअसून, शहरातील दोन हजार कामगारांची प्रतिदिन ७५ हजार रुपये मजुरी बुडणारआहे. त्यामुळे या वीज भारनियमनामुळे यंत्रमागधारक संतप्त झाले आहेत.विटा शहरात वस्त्रोद्योग यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेमहावितरणने चार फिडर तयार केले आहेत. त्यातील दोन फिडर ए ग्रुपला, तरदुसरे दोन फिडर बी ग्रुपला जोडले आहेत. त्यातील ए ग्रुपला सव्वातीन तासआणि बी ग्रुपला ४ तास वीज भारनियमन निश्चित केल्याने सरासरी भारनियमनसाडेतीन तासाचे समजण्यात येत आहे.

विट्यात सहा हजार यंत्रमागधारक सव्वातीन तासात सरासरी १२ मीटर कापड तयारकरतात. त्यामुळे सव्वातीन तासाच्या कालावधित सुमारे ७५ हजार मीटरकापडाच्या उत्पन्नावर पाणी पडणार आहे. दरम्यान, या यंत्रमागावर कामकरणाºया कामगारांची संख्या दोन हजाराच्या आपपास आहे. त्यामुळेकामगारांनाही भारनियमनाचा फटका बसला असून, दररोज ७५ हजार रुपयांच्यामजुरीला मुकावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या या भारनियमनामुळेसर्वसामान्य व वस्त्रोद्योग व्यावसायिकांत संतापाची लाट उसळली आहे. 

प्रश्नाला वाचा फोडणार : किरण तारळेकरमहावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे भारनियमन करावे लागत आहे. कोळसासंपल्याचे सांगून महावितरण स्वत:चे हसू करून घेऊ लागले आहे. शेतकरी,उद्योजक व सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन या प्रश्नाला वाचा फोडली जाईल.भविष्यात सर्वच ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज मिळाली पाहिजे, असे मत विटायंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी व्यक्त केले.