शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

By admin | Updated: April 12, 2017 22:57 IST

३५० जणांचे श्रमदान : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहीम; यशस्वी करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

औंध : खटाव तालुका व कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या, औंधपासून सहा किलोमीटर अंतरावरील व कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी या गावाने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम एकजुटीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुमारे ३५० नागरिक, महिला, युवक, युवतींनी कामाला प्रारंभ केला असून, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. पवारवाडी हे गाव औंधच्या पश्चिमेला घाटाखाली सहा किलोमीटर अंतरावर आहे. घाटाखालील बऱ्याचशा गावांमधून कॅनॉल, पोटकॅनॉल गेले आहेत; पण पवारवाडी हे गाव हुकमी शेती पाण्यापासून वंचित आहे. गावामध्ये १९० कुटुंबे व ९०३ एवढी लोकसंख्या आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने गावातील बरेचसे नागरिक, युवक नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरच आहेत.गावालगत पेरणी योग्य २३८ हेक्टर जमीन आहे. तर ९४ हेक्टरवर फॉरेस्ट, २२ हेक्टरवर सरकारी जमीन आहे. मात्र, पाणीच उपलब्ध होत नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात या जमिनीतून पीक उत्पन्न निघत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाईही काहीवेळा जाणवते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गावाच्या सभोवती असणाऱ्या उजाड डोंगर रांगांचा, चढ-उतारांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कृषी विभाग, वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपूर, पाणी फाउंडेशन, गावातील माजी विद्यार्थी संघटना, परांजपे अ‍ॅटोकास्ट आदींच्या सहकार्यातून हे काम तडीस नेण्यात येणार आहे. ४२ दिवसांत हे सर्व काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजेंद्र पवार यांनी दिली.या माध्यमातून नालाबंडिंग, सलग समतल चर, डीपसीसीटी, बंधारे, माती बांध, तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, विहिरींचे पुनर्भरण, अनगड दगडी बांध घालणे व अन्य कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत. तसेच ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर योजनेद्वारेच शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून कामाने गती घेतली असून, सकाळी ७ ते ११ असे नियमित चार तास काम केले जाणार आहे. हे काम सुरू झाल्याने गावात उत्साह, आनंदाचे वातावरण असून, कोणत्याही परिस्थितीत गाव पाणीटंचाई मुक्त करायचेच असा दृढ निश्चय प्रत्येक ग्रामस्थ, महिला, युवक, युवतींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच सिंधुताई पवार, विलास पवार, पांडुरंग पवार, समन्वयक मोहन लाड, कृषी सहायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)