शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

वॉटर कप स्पर्धेसाठी पवारवाडी एकवटली !

By admin | Updated: April 12, 2017 22:57 IST

३५० जणांचे श्रमदान : ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहीम; यशस्वी करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

औंध : खटाव तालुका व कोरेगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या, औंधपासून सहा किलोमीटर अंतरावरील व कोरेगाव तालुक्यातील पवारवाडी या गावाने पिण्याच्या, शेतीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ ही मोहीम एकजुटीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सुमारे ३५० नागरिक, महिला, युवक, युवतींनी कामाला प्रारंभ केला असून, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत बाजी मारण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. पवारवाडी हे गाव औंधच्या पश्चिमेला घाटाखाली सहा किलोमीटर अंतरावर आहे. घाटाखालील बऱ्याचशा गावांमधून कॅनॉल, पोटकॅनॉल गेले आहेत; पण पवारवाडी हे गाव हुकमी शेती पाण्यापासून वंचित आहे. गावामध्ये १९० कुटुंबे व ९०३ एवढी लोकसंख्या आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने गावातील बरेचसे नागरिक, युवक नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने बाहेरच आहेत.गावालगत पेरणी योग्य २३८ हेक्टर जमीन आहे. तर ९४ हेक्टरवर फॉरेस्ट, २२ हेक्टरवर सरकारी जमीन आहे. मात्र, पाणीच उपलब्ध होत नसल्याने रब्बी, उन्हाळी हंगामात या जमिनीतून पीक उत्पन्न निघत नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाईही काहीवेळा जाणवते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गावाच्या सभोवती असणाऱ्या उजाड डोंगर रांगांचा, चढ-उतारांचा उपयोग पाणी अडविण्यासाठी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. कृषी विभाग, वसंतदादा पाटील शिक्षण संस्था रहिमतपूर, पाणी फाउंडेशन, गावातील माजी विद्यार्थी संघटना, परांजपे अ‍ॅटोकास्ट आदींच्या सहकार्यातून हे काम तडीस नेण्यात येणार आहे. ४२ दिवसांत हे सर्व काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सरपंच राजेंद्र पवार यांनी दिली.या माध्यमातून नालाबंडिंग, सलग समतल चर, डीपसीसीटी, बंधारे, माती बांध, तलाव दुरुस्ती, गाळ काढणे, विहिरींचे पुनर्भरण, अनगड दगडी बांध घालणे व अन्य कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत. तसेच ठिबक सिंचन, मायक्रो स्प्रिंकलर योजनेद्वारेच शेतीच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून कामाने गती घेतली असून, सकाळी ७ ते ११ असे नियमित चार तास काम केले जाणार आहे. हे काम सुरू झाल्याने गावात उत्साह, आनंदाचे वातावरण असून, कोणत्याही परिस्थितीत गाव पाणीटंचाई मुक्त करायचेच असा दृढ निश्चय प्रत्येक ग्रामस्थ, महिला, युवक, युवतींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच सिंधुताई पवार, विलास पवार, पांडुरंग पवार, समन्वयक मोहन लाड, कृषी सहायक शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)