शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

जतमध्ये कचरा डेपोतच टाकला मैला

By admin | Updated: March 30, 2015 00:17 IST

नगरपालिकेचा कारभार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात; मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला

जयवंत आदाटे : जत  नगरपालिकेने शौचालयाची टाकी साफ (स्वच्छ) करून टँकरमध्ये भरलेला मैला गावाच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी स्मशानभूमीजवळ असलेल्या कचरा डेपोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे.शहराच्या मध्य वस्तीतून जाणाऱ्या विजापूर ते गुहागर राज्य मार्गालगत देवकते कॉलनीलगत हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या पूर्व बाजूस पालिकेने कचरा डेपो तयार केला आहे. काहीवेळा कचरा रस्त्यालगतच टाकला जातो, तर काहीवेळा हा कचरा पेटवून दिला जातो. त्यातून धुराचे लोट दिवस-रात्र निघत असतात. रस्त्यालगत टाकलेला कचरा रस्त्यावर येतो. काहीवेळा त्यात पावसाचे पाणी जाऊन दुर्गंधी निर्माण होते, तर काहीवेळा धुराचे लोट निघून या परिसरातील नागरिक व बालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकार बंद झाले होते.या घटनेस तीन-चार महिने होत नाहीत, तोपर्यंत नगरपालिका आरोग्य विभागाने शौचालयाची टाकी स्वच्छ करुन त्यातील मैला टँकरमध्ये भरुन ते स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोत टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील कचरा व मैला कुजून त्याची दुर्गंधी या परिसरात पसरु लागली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे.जत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. शहरातील सर्वच कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलून तो स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोजवळ टाकला जात आहे. या परिसरातच जत शहरातील गटारीचे पाणी नाल्यातून येथे एकत्र जमा होत आहे. त्यामुळे या परिसरात मोकाट जनावरे, डुकरे व कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात येथे वावर असतो. रात्री-अपरात्री या रस्त्यावरून चालत जाताना मोकाट कुत्र्याचे कळप फिरत असतात. त्यांचा नागरिकांवर कधीही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायी उपाययोजनेची मागणीजत शहराची लोकसंख्या सुमारे चाळीस हजार इतकी आहे. शहरातील सर्वच कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलून तो स्मशानभूमीलगत असलेल्या कचरा डेपोजवळ टाकला जात आहे. आरोग्य विभागाने मैलामिश्रित पाणी येथील कचरा डेपोत टाकू नये. त्याची इतरत्र विल्हेवाट लावावी. येथील कचरा डेपो अन्यत्र हलवून स्मशानभूमी परिसरातील दुर्गंधी कमी करावी. या परिसरात जमा होणारे सांडपाण्याची विल्हेवाट लावावी किंवा त्यासंदर्भात पर्यायी उपाय-योजना करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.