शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जलपुरुषाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवड

राजापूर : डिसेंबर महिन्यात राजापूर दौऱ्यावर येणारे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून, त्यावेळी अर्जुना नदी परिक्रमा व ग्रामस्थ मेळावा पार पडणार आहे.कोकणात दरवर्षी तुफान पाऊस पडूनदेखील उन्हाळी दिवसात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत कोकण भूमी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून, कोकणातील नद्या बारमाही सजीव राहतील व त्याचा फायदा सर्वांना होईल या हेतूने जलपुरुष व मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून व जनतेच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी व राजापूर तालुक्यातील अर्जुना या नद्यांना सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या नद्यांच्या परिक्रमेसाठी स्वत: डॉ. राजेंद्र सिंह हे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत कोकणात येत आहेत. १ डिसेंबरला त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, ४ डिसेंबरला ते राजापुरात येतील. त्यांच्यासमवेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ४ डिसेंबरला ओणीमध्ये मेळावा पार पडल्यानंतर राजापुरात गणेश विसर्जन घाटावर पूजन होईल असा नियोजित कार्यक्रम आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात संपूर्ण अर्जुना नदीची परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जेथे अर्जुना नदीचा उगम होतो त्या स्थानापासून समुद्र संगमापर्यंत उभय काठावरील गावातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.अर्जुना नदीच्या उगमापासून उत्तरेला करक, पाचल पेठवाडी, येळवण, खडीकोळवण, सौंदळ, चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ, राजापूर, धुतपापेश्वर, गोळव, शिवणे, सोगमवाडी, सोड्येवाडी, राऊतवाडी, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली, नाटे, साखरीनाटे तर दक्षिणेला करक, तळवडे, पाचल, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, आडवली, फुफेरे, आंगले, शेंबवणे, दोनिवडे, उन्हाळे, राजापूर, कोंडेतड, कणेरी, शेढे, डोंगर, विलये, पडवे, मिरगुलेवाडी, चव्हाणवाडी, दळे, आगरवाडी, जैतापूर व जुवे जैतापूर अशी गावे येत आहेत. (प्रतिनिधी)1जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवडनद्यांना लोकसहभागातून बारमाही प्रवाह कसा राहिल यासहित नदीकाठच्या गावातील किनाऱ्यांवर आधुनिक शेती व त्यातून समृद्धी करणे, नद्यांवर छोटी धरणे बांधणे, नद्यांचा डोह खोल करणे अशी कामे भविष्यात केली जाणार आहेत व त्यासाठीच अर्जुना नदीची निवड करण्यात आली आहे.2दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.