शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जलपुरुषाच्या कार्यक्रमाची जंगी तयारी

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवड

राजापूर : डिसेंबर महिन्यात राजापूर दौऱ्यावर येणारे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे यांच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून, त्यावेळी अर्जुना नदी परिक्रमा व ग्रामस्थ मेळावा पार पडणार आहे.कोकणात दरवर्षी तुफान पाऊस पडूनदेखील उन्हाळी दिवसात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. याबाबत कोकण भूमी प्रतिष्ठानच्यावतीने पुढाकार घेण्यात आला असून, कोकणातील नद्या बारमाही सजीव राहतील व त्याचा फायदा सर्वांना होईल या हेतूने जलपुरुष व मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून व जनतेच्या सहभागातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी व राजापूर तालुक्यातील अर्जुना या नद्यांना सर्वप्रथम समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या नद्यांच्या परिक्रमेसाठी स्वत: डॉ. राजेंद्र सिंह हे १ ते ५ डिसेंबर या कालावधीत कोकणात येत आहेत. १ डिसेंबरला त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, ४ डिसेंबरला ते राजापुरात येतील. त्यांच्यासमवेत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे - पालवे, पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्यासहित अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ४ डिसेंबरला ओणीमध्ये मेळावा पार पडल्यानंतर राजापुरात गणेश विसर्जन घाटावर पूजन होईल असा नियोजित कार्यक्रम आहे. त्याची जय्यत तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात संपूर्ण अर्जुना नदीची परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जेथे अर्जुना नदीचा उगम होतो त्या स्थानापासून समुद्र संगमापर्यंत उभय काठावरील गावातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.अर्जुना नदीच्या उगमापासून उत्तरेला करक, पाचल पेठवाडी, येळवण, खडीकोळवण, सौंदळ, चिखलगाव, गोठणे दोनिवडे, शीळ, राजापूर, धुतपापेश्वर, गोळव, शिवणे, सोगमवाडी, सोड्येवाडी, राऊतवाडी, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली, नाटे, साखरीनाटे तर दक्षिणेला करक, तळवडे, पाचल, रायपाटण, बागवेवाडी, परटवली, आडवली, फुफेरे, आंगले, शेंबवणे, दोनिवडे, उन्हाळे, राजापूर, कोंडेतड, कणेरी, शेढे, डोंगर, विलये, पडवे, मिरगुलेवाडी, चव्हाणवाडी, दळे, आगरवाडी, जैतापूर व जुवे जैतापूर अशी गावे येत आहेत. (प्रतिनिधी)1जलपरिक्रमासाठी अर्जुना नदीची निवडनद्यांना लोकसहभागातून बारमाही प्रवाह कसा राहिल यासहित नदीकाठच्या गावातील किनाऱ्यांवर आधुनिक शेती व त्यातून समृद्धी करणे, नद्यांवर छोटी धरणे बांधणे, नद्यांचा डोह खोल करणे अशी कामे भविष्यात केली जाणार आहेत व त्यासाठीच अर्जुना नदीची निवड करण्यात आली आहे.2दरवर्षी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसते. या गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.