शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

जिल्हा बँकेतील भरतीची आचारसंहितेनंतरही प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरही रेंगाळल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया रेंगाळली : सात हजारावर अर्जदारांचे लक्ष लागले

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती आता आचारसंहिता संपल्यानंतरही रेंगाळल्याचे चित्र आहे. लिपिक पदासाठी ७ हजारांवर अर्ज दाखल झाले असल्याने या सर्व उमेदवारांचे लक्ष प्रक्रियेकडे लागले आहे.

सांगली जिल्हा बॅँकेत प्रदीर्घ काळ रखडलेली कर्मचारी भरती लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू झाली. एकूण चारशे लिपिक पदांसाठी ही भरती आहे. तांत्रिक व अधिकारी पदांची भरती प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे जूनमध्ये जिल्हा बॅँकेची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन बॅँकेतील सध्याच्या कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होण्याची चिन्हे होती. प्रत्यक्षात जूनमधील पहिला आठवडा संपला असतानाही, अद्याप लेखी परीक्षेबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. यापूर्वी बँकेत विलासराव शिंदे अध्यक्ष असताना २००१ मध्ये सरळ सेवेने कर्मचारी भरती झाली होती. त्यानंतर गेल्या १८ वर्षात बँकेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त झाल्याने सध्याच्या अधिकारी, कर्मचाºयांवर ताण पडत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये शासनाने सांगली जिल्हा बँकेच्या नवीन १ हजार ४४२ पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी दिली होती.

आकृतिबंधाबरोबरच रिक्त जागा भरण्यासही मान्यता दिली होती. मात्र या जागा भरण्यास विलंब झाला. जिल्हा बँकेची भरती प्रक्रिया आॅनलाईन होत आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया मार्चमध्ये पार पडली. या कालावधित ७ हजार २४२ अर्ज दाखल झाले आहेत. यातील काही अर्ज अपात्रही ठरले आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने अर्जाच्या प्रक्रियेनंतर नोकरभरती तात्पुरती थांबविण्यात आली. आचारसंहितेच्या काळात परीक्षा न ठेवता ती आचारसंहिता संपल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. जिल्ह्यात २३ मे रोजी मतमोजणी झाली. त्यानंतर उमेदवारांची आॅनलाईन परीक्षा मेअखेरीस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. प्रत्यक्षात मे महिना संपल्यानंतर आता जूनचा पहिला आठवडाही गेला, तरी लेखी परीक्षेबाबत काहीही सूचना प्रसिद्ध झालेली नाही. अर्ज दाखल करताना उमेदवारांना २ हजार रुपये शुल्क भरण्याचे बंधन होते. त्यातून बॅँकेकडे तब्बल दीड कोटी मिळाले आहेत.उमेदवारांकडून होत : आहे विचारणाबँकेच्या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून लेखी परीक्षेबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया किती दिवसात सुरू होईल, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.

टॅग्स :bankबँकSangliसांगलीjobनोकरी