शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election महिला मतदारांचे मतदान उमेदवारांसाठी ठरणार निर्णायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:19 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी मतदारांतील कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी मतदारांतील कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांना संसदेपर्यंत जाण्यासाठी जशी तरुण मतदारांची आवश्यकता आहे, अगदी तशीच महिला मतदारांचे मतदानही महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या चार लोकसभा निवडणुकींचा अपवाद वगळता, पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी मतदानाचा हक्क बजाविल्याने ‘स्त्री शक्ती’चे मत मिळविण्यासाठी उमेदवारांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात असताना, मतदारांतील कोणता घटक उमेदवारांना तारणार, याचीही चर्चा होताना दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानादिवशी पुरुषांपेक्षाही महिलांचा उत्साह अधिक दिसून आला आहे.प्रश्नांना वाली कोण?जानेवारीअखेरच्या यादीनुसार सांगली मतदारसंघात १७ लाख ९२ हजार १३१ मतदार आहेत. यात ८ लाख ६७ हजार ४४१ महिला मतदार आहेत. मतदारसंघातील महिला मतदारांचा टक्का मोठा असला तरी, महिलांच्या प्रश्नांवर अद्यापही उपाययोजना दिसून येत नाहीत. जिल्ह्याचा पूर्वभाग सध्या दुष्काळाने होरपळून निघत असून, पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी महिला वर्गाला मैलो न मैल भटकंती करावी लागत आहे.40%चाळिशीच्या आतील मतदारांवर जशी उमेदवारांची मदार असणार आहे, अगदी तशीच महिलांच्या मतांवरही भिस्त राहील.48%मतदार महिला असून, पुरुषांच्या जवळपास बरोबरीची संख्या आहे. त्यांच्या मतदानाचा टक्काही वाढत आहे.55%ही गेल्या चार निवडणुकांमधील महिला मतदानाची सरासरी टक्केवारी आहे. पुरुषांपेक्षा ही टक्केवारी कमी असली तरी, ती निर्णायक ठरणारी आहे. १९९९ ला सर्वाधिक ६९.६0 टक्के महिलांचे मतदान झाले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक