शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

वाहन घसरल्याशिवाय विटा-खानापूर महामार्गावर पुढे जातच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:03 PM

करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत.

ठळक मुद्देवाहनचालकांची कसरत : पावसामुळे रस्त्यावर चिखल; प्रवाशांचा जीव टांगणीला

विटा : करोडो रुपयांचा निधी खर्च करून सुरू करण्यात आलेला विटा ते खानापूर हा नवीन राष्टय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल व चिखल झाल्याने वाहने घसरू लागली आहेत. प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून, खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ कर्नाटकच्या प्रवासी बसचा अपघात नुकताच टळला.

केंद्र शासनाने गुहागर ते विजापूर या राष्टय महामार्ग निर्मितीला सुरुवात केली आहे. रेणावीपासून पुढे भिवघाटपर्यंत या महामार्गाचे काम गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. जुना राज्यमार्ग खोदून रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यावर तामखडीजवळ लाल मातीमुळे मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारी कर्नाटक राज्याची खानापूरकडे जाणारी बस या चिखलामुळे घसरत नाल्याकडील बाजूला गेली.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने या बसचा अपघात टळला आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या बसबरोबरच खासगी चारचाकी वाहने व दुचाकीस्वारांनाही या महामार्र्गाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीही रेवणगावजवळ चिखलामुळे वाहने घसरू लागल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, हैदराबादकडे जाणाऱ्या बसेसची वाहतूक लेंगरे, भूडमार्गे वळविण्यात आली होती.

शनिवारीही पावसाने दलदल झाल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. विटा ते खानापूर या नवीन राष्टÑीय महामार्गाचे अर्धवट काम सोडून ठेकेदार गायब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने त्याचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.सध्या तरी पावसामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वारेमाप चिखल झाल्याने प्रत्येक वाहन घसरत आहे. वाहनधारक व प्रवाशांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.विटा ते खानापूरदरम्यान सुरू असलेल्या नवीन राष्टÑीय महामार्गावर पावसामुळे दलदल झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कर्नाटक राज्याच्या प्रवासी बसला होणारा अपघात चालकाच्या प्रसंगावधानाने टळला.

टॅग्स :Rainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षा