शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

विश्वेश्वरय्या : अभियंत्यांचे आयडॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST

विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी ...

विश्वेश्वरय्या यांच्या कार्याला पुन्हा उजाळा मिळतो तो ‘अभियंतादिनी’च. अभियंत्यांनी केलेल्या कामांची लोकांना ओळख व्हावी, अभियंत्यांना लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळावी, लोकांकडून त्यांना त्यांच्या कामाची शाबासकी मिळावी, या हेतूने ‘अभियंता दिन’ साजरा करून अभियंत्यांचा गौरवही केला जातो. विश्वेश्वरय्या यांनी दिलेल्या कानमंत्रानुसारच आजही अभियंत्यांचे कार्य चालू आहे. शेतीव्यावसायिक पद्धतीने केल्याने अधिक उत्पादन मिळू शकते, देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये विश्वेश्वरय्या यांनीच जागविला. जेव्हा मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना असे, त्यावेळी सर विश्वेश्वरय्या हे अभियांत्रिकीच्या पलीकडे जाऊन विचार करीत असत. प्रस्तावित प्रकल्प हा कसा जास्तीत-जास्त समाजोपयोगी ठरेल व आर्थिकदृष्ट्या परवडणारा असेल, याचा ते बारकाईने अभ्यास करीत असत. त्यांची धोरणे आणि त्यांनी उभारलेली धरणे, इमारती, पूल आजही आमच्यासाठी अभ्यासाचा विषय आहे.

भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतीचा विकास झाल्याशिवाय सर्वांगीण विकास होणार नाही, यावर त्यांचा विश्वास होता. याचमुळे त्यांनी अनेक कृषी विद्यालये सुरू केली. शेती ही केवळ पाऊस व नशिबावर अवलंबून ठेवणे योग्य नाही; तर ती शास्त्रीय आणि व्यावसायिक पद्धतीने करता येऊ शकते, त्यामुळे अधिक उत्पादन मिळू शकते, परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळू शकते, असा आत्मविश्वास त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागविला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उच्च शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये स्थापन केली, शिवाय म्हैसूर विद्यापीठाचीही मुहूर्तमेढ रोवली.

सर विश्वेश्वरय्या यांनी महात्मा गांधीजींच्या बरोबरीनेही हिरीरिने काम केले. काहीबाबतीत त्यांचे मत-मतांतरे असली तरी, ध्येय एकच होते, ते म्हणजे ‘राष्ट्रउभारणी.’ भारत हा खेड्यांनी बनलेला देश आहे. महाराष्ट्रातील मोठ्या धरणांचा पाया घालण्यातही त्यांचा मोलाचा वाटा आहे.