शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महापुरानंतरही विश्वजित कदम कृष्णाकाठासोबत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:44 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम सरसावले आहेत. महापुरापूर्वी आणि नंतरही त्यांची मदत सुरूच आहे. पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील १९ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम हे वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार महापुरात पूरग्रस्तांसोबत पहिल्या दिवसापासून राहिले. भर पावसात पाण्यात जाऊन पूरग्रस्त नागरिक, महिला, मुले तसेच जनावरे कशी सुरक्षित बाहेर काढता येतील याची काळजी घेतली. बाहेर पडल्यानंतर भारती विद्यापीठ व परिवाराच्यावतीने पूरग्रस्तांना निवास, भोजन व आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या. सोनहिरा साखर कारखान्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आता महापूर ओसरल्यानंतर दगावलेली माणसे, जनावरे, पडलेली घरे, शेतीचे व उद्योगांचे झालेले नुकसान याची प्रत्येक गावात समक्ष भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने स्वच्छता व आरोग्य सेवेमध्ये योगदान दिले आहे. राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना ठोस मदत मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.सर्वच पूरग्रस्तांपर्यंत समान मदत पोहोचत नाही, त्यासाठी जादा मदतीची गरज असल्याचे ओळखून, त्यांनी ‘डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्ष’ स्थापन केला. त्यामध्ये भारती विद्यापीठ व संलग्न व्यक्ती, संस्थांनी मदत जमा केली. अंथरूण, पांघरूण, संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्य, कपडे असे दर्जेदार वस्तूंचे कीट बनविले. त्याचे गावनिहाय वेळापत्रक बनवून वाटप सुरू केले आहे.पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, धनगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे, नागठाणे, आमणापूर, विठ्ठलवाडी, संतगाव, सूर्यगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, दुधोंडी, घोगाव, तुपारी, दह्यारी आदी गावांमधील पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.