शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महापुरानंतरही विश्वजित कदम कृष्णाकाठासोबत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:44 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कभिलवडी : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम सरसावले आहेत. महापुरापूर्वी आणि नंतरही त्यांची मदत सुरूच आहे. पलूस तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील १९ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात येत आहे.डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र आमदार विश्वजित कदम हे वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार महापुरात पूरग्रस्तांसोबत पहिल्या दिवसापासून राहिले. भर पावसात पाण्यात जाऊन पूरग्रस्त नागरिक, महिला, मुले तसेच जनावरे कशी सुरक्षित बाहेर काढता येतील याची काळजी घेतली. बाहेर पडल्यानंतर भारती विद्यापीठ व परिवाराच्यावतीने पूरग्रस्तांना निवास, भोजन व आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या. सोनहिरा साखर कारखान्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. आता महापूर ओसरल्यानंतर दगावलेली माणसे, जनावरे, पडलेली घरे, शेतीचे व उद्योगांचे झालेले नुकसान याची प्रत्येक गावात समक्ष भेट देऊन पाहणी केली. भारती विद्यापीठ, सोनहिरा साखर कारखान्याच्यावतीने स्वच्छता व आरोग्य सेवेमध्ये योगदान दिले आहे. राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना ठोस मदत मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.सर्वच पूरग्रस्तांपर्यंत समान मदत पोहोचत नाही, त्यासाठी जादा मदतीची गरज असल्याचे ओळखून, त्यांनी ‘डॉ. पतंगराव कदम आपत्ती निवारण कक्ष’ स्थापन केला. त्यामध्ये भारती विद्यापीठ व संलग्न व्यक्ती, संस्थांनी मदत जमा केली. अंथरूण, पांघरूण, संसारोपयोगी साहित्य, भांडी, धान्य, कपडे असे दर्जेदार वस्तूंचे कीट बनविले. त्याचे गावनिहाय वेळापत्रक बनवून वाटप सुरू केले आहे.पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोप, धनगाव, चोपडेवाडी, सुखवाडी, खटाव, ब्रम्हनाळ, वसगडे, नागठाणे, आमणापूर, विठ्ठलवाडी, संतगाव, सूर्यगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, दुधोंडी, घोगाव, तुपारी, दह्यारी आदी गावांमधील पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे.