शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

संकटकाळात लोकांसाठी धावणारे नेतृत्व विशालदादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST

माणसाची खरी पारख संकटकाळात होते, असे म्हटले जाते. संकटात मदतीला, आधाराला येणारी माणसं लोकांच्या ह्दयात कायमचे घर करून राहतात. ...

माणसाची खरी पारख संकटकाळात होते, असे म्हटले जाते. संकटात मदतीला, आधाराला येणारी माणसं लोकांच्या ह्दयात कायमचे घर करून राहतात. गेल्या पाच वर्षांत सांगली जिल्ह्यावर अनेक संकटे आली. या प्रत्येक संकटात लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवून संकटात सोबत असल्याबाबतचा दिलासा देण्यासाठी एका नेतृत्वाने धडपड केली. ते नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे युवा नेते विशालदादा पाटील. अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाने, दिलदार स्वभावाने त्यांनी लोकांच्या ह्दयात घर केले.

समाजकारण आणि समाजकारणाच्या अंगाने राजकारण करण्याचा वारसा दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडून त्यांना मिळाला. दादांचे नातू म्हणून लोक त्यांच्याकडून ज्या अपेक्षांनी पहात होते, त्या अपेक्षांना खरे उतरत विशाल पाटील यांनी अल्पावधीत लोकांना आपलेसे केले. शहर असो की गावखेडे प्रत्येक ठिकाणच्या माणसांशी संवाद साधत, मदतीचा हात देत त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले आहे. राजकारणातल्या पदांपेक्षा लोकांच्या ह्दयातील अढळपद मिळविण्याची त्यांची धडपड बऱ्याचअंशी यशस्वी होताना दिसत आहे. २०१९ चा महापूर असो की, कोरोनाच्या दोन लाटांचे संकेत या प्रत्येक काळात विशाल पाटील यांनी लोकांमध्ये जाऊन मदत केली.

कोरोनाच्या संकटकाळात जनजागृती व दिलासादायक भेटीतून विशाल पाटील यांनी जनतेला मोठा आधार दिला. गावोगावी सुरक्षासाधने पुरविण्याची मोहीम राबविली. त्यांची ही कार्यपद्धती लोकांसाठी वसंतदादांच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. पहिल्या लाटेवेळी मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाऊन तेथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. प्रत्येक गावातील आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी यांना प्रतिष्ठानच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सर्वच गावांत वसंतदादा कारखान्यातर्फे सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

दुसऱ्या लाटेतसुद्धा लोकांना आधार देताना त्यांनी वसंतदादांच्या नावाने कोविड केअर रुग्णालय उभारले. या माध्यमातून दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्णांवर उपचार होऊन त्यांना कोरोनातून मुक्ती मिळाली. रुग्णालये व वैद्यकीय साधनसुविधांची कमतरता भासत असताना व रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले असताना अशा अटीतटीच्या काळात वसंतदादा कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना बेडची उपलब्धता झाली आणि अनेकांचे प्राण वाचले. गोरगरीब रुग्णांसाठी हे सेंटर आधारवड बनले. कोरोनाची लाट ओसरत असताना गरजेवेळी मिळालेला विशालदादा पाटील यांचा हात लोकांची मने जिंकणारा ठरला.

पहिल्या लाटेवेळी तानंग येथे झारखंड राज्यातील २२ लोक लॉकडाऊनमध्ये अडकले होते. यासंदर्भात मधुसूदन मालू व दीपक पाटील यांनी विशाल पाटील यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली. दादांनी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विशेष बसची सोय केली. प्रवासादरम्यान मजुरांना खाद्यपदार्थ, पाणी बॉटल, सॅनिटायझरचे वाटप ‘विशालदादा युवा प्रतिष्ठान’च्यावतीने करण्यात आले होते.

त्यांचा हा एकूण प्रवास पाहिला म्हणजे हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यपंक्तीमधील काही ओळी समोर येतात.

तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी

तू न मुडेगा कभी...