शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अवघड भाषेतील समीक्षेने मराठीची हानी:वसंत केशव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:04 PM

सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत ...

सांगली : मराठीत लेखनासाठी अनेक दर्जेदार विषय असताना, मराठीतील लेखक आपल्याच कोशात रमले आहेत. त्यामुळे भाषेचा सर्वांगीण आवाका वाचकांपर्यंत पोहोचविण्यात अपयश येत आहे. सहज सोप्या भाषेत समीक्षण न करता, रूढ भाषा अवघड करत मराठीचे सर्वाधिक नुकसान हे समीक्षकांनीच केले असल्याची टीका ज्येष्ठ समीक्षक वसंत केशव पाटील यांनी रविवारी सांगलीत केले.शब्दसाहित्य विचार मंचच्यावतीने ‘लेखक समजून घेताना’ उपक्रमांतर्गत कवयित्री लता ऐवळे-कदम व युवा नाटककार इरफान मुजावर यांनी वसंत केशव पाटील यांची मुलाखत घेत, साहित्यविश्वातील अनेक घडामोडींवर प्रकाश टाकला. यावेळी पाटील यांनी परखडपणे मते व्यक्त करत साहित्यिकांच्या मानसिकतेवर प्रहार केला.पाटील म्हणाले की, साहित्यात अनेक प्रवाह असताना, साहित्यिकांनी हे प्रवाहच समजून घेतले नाहीत. किती लिहिले पाहिजे यापेक्षा काय लिहिले पाहिजे, हेच लेखकांना समजले नसल्याने, अनेक चांगले विषयही वाचकांपासून दूरच राहिले. समीक्षणातून वाचकांना अधिक समजणे अपेक्षित असताना, आपल्या मराठी समीक्षकांनी समीक्षणाची भाषा अवघड करून ठेवली व त्याचा फटका मराठी साहित्याला बसला. त्यापेक्षा सहज सोप्या भाषेतून समीक्षण झाले असते, तर ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचले असते. प्रत्येक लेखकाची बांधिलकी ही शब्दांशी असली पाहिजे.अनुवादनाच्या निमित्ताने देशभर फिरलो. यावेळी अनेकविध अनुभव आले. त्यांचा अनुवादनावेळी खूपच फायदा झाला. लेखन ही ताकद समजून मी त्याच्याशी प्रामाणिक राहून लेखन केले. त्यामुळे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाही मोर्चा, आंदोलनात कधी सहभागी झालो नाही. लेखनापेक्षा अनुवादित साहित्य जास्त असण्याचे कारण म्हणजे, वाचन जास्त झाल्याने अनुदानाकडे वळल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी शब्दसाहित्य विचार मंचचे अभिजित पाटील, सुधीर कदम, सचिन पाटील, डॉ. दिलीप कुलकर्णी, महादेव माने, नामदेव माळी, संजय पाटील, प्रतिभा जगदाळे, डॉ. दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.आजच्या कवींचे वाचन कमीआजचे कवी विविध माध्यमातून आपल्या कविता सादर करीत असले तरी, काही तरूण कवींचा अपवाद वगळता आजची कविता आशयाच्यादृष्टीने कमकुवत आढळते. नव्या कवींचे वाचन कमी होत असल्याने त्यांच्या कवितेतही ते जाणवत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.