शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

काँग्रेस, डाव्या पक्षांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:41 IST

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे. नोटाबंदीच्या काळात ज्यांना राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्याबाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत.

ठळक मुद्दे सीएए-एनआरसीबद्दल चुकीची माहिती पसरविली

सांगली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि येऊ घातलेला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. तो बाहेरच्या देशांमधून आलेल्या नागरिकांसाठी लागू केलेला आहे. परंतु, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या संघटना व पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवून देशात हिंसक आंदोलनास पाठबळ दिले आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी मंगळवारी येथील पत्रकार परिषदेत केला.

 

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे. नोटाबंदीच्या काळात ज्यांना राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्याबाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत. दिल्लीत या कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट बँकेसाठी सुरू आहे. नवे नागरिकता सुधारणा विधेयक संमत झाल्यावर जो भडका उडालेला आहे, त्यात तेल ओतण्यासाठी अनेक पुरोगामी, काँग्रेसचे नेते पुढे आले. अन्य राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि डाव्या संघटना व पक्षाचे नेते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गैरसमज पसरवत आहेत. आम्ही काही राज्यात जाऊन या कायद्यांबाबत जागृती सुरू केली आहे. तेथील आंदोलने शांत झाली आहेत.चौकटदेशाने केलेला कायदा कुठलेही राज्य नाकारू शकत नाहीदेशाच्या हिताचा केलेला कोणताही कायदा राज्याला नाकारण्याचा अधिकार नाही. तो कायदा एका राज्यासाठी नसून, संपूर्ण देशासाठी असतो. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कायदा लागू करणार नाही, म्हटले तरी तो देशात लागू झालेला आहे. अन्य राज्यातील काही मुख्यमंत्र्यांनीही आम्ही कायदा लागू करणार नाही, असे सुरुवातीला म्हटले होते. पण, त्या कायद्याविषयी माहिती झाल्यानंतर सध्या ते गप्प आहेत. ठाकरेंना कायदा कळल्यानंतर तेही कायद्याचा आदर करतील, अशी टीकाही भंडारी यांनी केली.चौकटएक कोटी निर्वासितांना नागरिकत्व मिळणारपाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगला देशातील हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारशी या अल्पसंख्याकांच्या हक्कांचे भारतात रक्षण करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आहे. या तीन देशातून भारतात घुसखोरी करणाऱ्यांशी या अल्पसंख्याकांना समान समजले जाणार नाही. या तीन देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या अल्पसंख्य निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. १९५० ते ७० या वर्षात ५० लाख आणि त्यानंतर २०१४ अखेरपर्यंत ५० लाख अशी एक कोटी निर्वासितांची संख्या असून, त्यांना नागरिकत्व मिळणार आहे, असे मतही माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Sangliसांगली