शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेस, डाव्या पक्षांमुळेच आंदोलनाला हिंसक वळण : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 20:41 IST

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे. नोटाबंदीच्या काळात ज्यांना राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्याबाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत.

ठळक मुद्दे सीएए-एनआरसीबद्दल चुकीची माहिती पसरविली

सांगली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि येऊ घातलेला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. तो बाहेरच्या देशांमधून आलेल्या नागरिकांसाठी लागू केलेला आहे. परंतु, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या संघटना व पक्षाच्या नेत्यांनी नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरवून देशात हिंसक आंदोलनास पाठबळ दिले आहे, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी मंगळवारी येथील पत्रकार परिषदेत केला.

 

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे. नोटाबंदीच्या काळात ज्यांना राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्याबाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत. दिल्लीत या कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होट बँकेसाठी सुरू आहे. नवे नागरिकता सुधारणा विधेयक संमत झाल्यावर जो भडका उडालेला आहे, त्यात तेल ओतण्यासाठी अनेक पुरोगामी, काँग्रेसचे नेते पुढे आले. अन्य राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि डाव्या संघटना व पक्षाचे नेते नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात गैरसमज पसरवत आहेत. आम्ही काही राज्यात जाऊन या कायद्यांबाबत जागृती सुरू केली आहे. तेथील आंदोलने शांत झाली आहेत.चौकटदेशाने केलेला कायदा कुठलेही राज्य नाकारू शकत नाहीदेशाच्या हिताचा केलेला कोणताही कायदा राज्याला नाकारण्याचा अधिकार नाही. तो कायदा एका राज्यासाठी नसून, संपूर्ण देशासाठी असतो. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कायदा लागू करणार नाही, म्हटले तरी तो देशात लागू झालेला आहे. अन्य राज्यातील काही मुख्यमंत्र्यांनीही आम्ही कायदा लागू करणार नाही, असे सुरुवातीला म्हटले होते. पण, त्या कायद्याविषयी माहिती झाल्यानंतर सध्या ते गप्प आहेत. ठाकरेंना कायदा कळल्यानंतर तेही कायद्याचा आदर करतील, अशी टीकाही भंडारी यांनी केली.चौकटएक कोटी निर्वासितांना नागरिकत्व मिळणारपाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगला देशातील हिंदू, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शीख आणि पारशी या अल्पसंख्याकांच्या हक्कांचे भारतात रक्षण करण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आहे. या तीन देशातून भारतात घुसखोरी करणाऱ्यांशी या अल्पसंख्याकांना समान समजले जाणार नाही. या तीन देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या अल्पसंख्य निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे. १९५० ते ७० या वर्षात ५० लाख आणि त्यानंतर २०१४ अखेरपर्यंत ५० लाख अशी एक कोटी निर्वासितांची संख्या असून, त्यांना नागरिकत्व मिळणार आहे, असे मतही माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :Sangliसांगली