शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कणदूर बनलंय सैनिकांचे गाव

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

नवी ओळख : स्पर्धा परीक्षेतून आठजण अधिकारी

सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील कणदूर गावची अलीकडे सैनिक व अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गावातील ३१ युवकांनी सैन्य व पोलीस दलात नोकरी मिळविली असून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ८ जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारीपदाचा बहुमान मिळविला आहे. गावातील युवकांच्या या यशामुळे बेरोजगारांना प्रेरणा मिळत आहे.कणदूर हे सुमारे साडेतीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेले वारणाकाठचे गाव. उच्च प्रतीच्या गुळाची निर्मिती करणारे गाव म्हणून गावची ओळख आहे. गावात ग्रामसचिवालय, बँक, वाचनालय, उपक्रमशील तरुण मंडळांबरोबरच गावातील मुलांना व युवकांना शिक्षण देणारी जि. प. शाळा, दत्त विद्यालय, पी. डी. पवार उच्च माध्यमिक विद्यालय व अंबिका माध्यमिक विद्यालय ही शिक्षण केंद्रे, तर युवकांना कुस्ती खेळाचे धडे देणारी तालीम, ही गावची वैशिष्ट्ये. दोन-तीन वर्षांपूर्वी गावातील जगन्नाथ पाटील, हरिदास पाटील, शीतल पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, सुहास कांबळे यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारीपद पटकावून गावातील युवकांपुढे खरा आदर्श निर्माण केला. त्यांच्या यशातून प्रेरणा घेऊन आज गावातील असंख्य युवक-युवती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताहेत. दुसरीकडे सुमारे ३० माजी सैनिक असलेल्या या गावात युवकांनी अलीकडे सैन्य व पोलीस दलात जाण्याचा धडाका लावला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत गावातील तब्बल ३१ युवकांनी सैन्यदलात व पोलीस दलात नोकरी मिळविली आहे. आज गावातील आठजण अधिकारी, ४५ जण आजी सैनिक, ३० जण माजी सैनिक, तर सुमारे २० जण पोलीस दलात कार्यरत आहेत. शिवाय असंख्य युवकांनी अभियांत्रिकीमधील पदवी व पदविका प्राप्त करून वेगळा ठसा निर्माण केला आहे. युवकांपुढे आदर्शदोन-तीन वर्षांपूर्वी जगन्नाथ पाटील, हरिदास पाटील, शीतल पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, महादेव पाटील, राहुल पाटील, सुहास कांबळे यांनी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून अधिकारीपद पटकावून गावातील युवकांपुढे आदर्श निर्माण केला.