शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

विजयनगर नाल्याचे झाले गटार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विजयनगर येथील नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाली आहे. महापालिकेने नाल्यालगतच अनेक बांधकामांना परवाने दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विजयनगर येथील नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाली आहे. महापालिकेने नाल्यालगतच अनेक बांधकामांना परवाने दिले आहेत. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक मार्ग बदलून त्याला गटारीचे स्वरुप देण्यात आले. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार केल्या. पण ढिम्म महापालिका प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे.

विजयनगर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायालयाची नवी इमारत झाल्यापासून या परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून कित्येक वर्षापासून नैसर्गिक नाला वाहतो. नाल्याशेजारी बांधकामांना परवानगी देताना काही नियम आहेत. पण नगररचना विभागाने हे नियम गुंडाळून अनेकांना परवाने दिले. परिणामी नैसर्गिक नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यावर अतिक्रमण करून इमारती उभारल्या आहेत. काहींनी घरे बांधली आहेत, तर काहींना कंपाऊंड घातले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाचा मार्गच बदलला आहे. त्यामुळे या नैसर्गिक नाल्याची स्थिती गटारीसारखी झाला आहे. गेल्या दोन वर्षात तर या परिसरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पूर्वी केवळ पावसाचे पाणी या नाल्यातून वाहात होते. आता त्यात मैलामिश्रित व सांडपाणीही सोडले जात आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे आजार पसरले आहेत. अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. विजयनगर नाल्याचा प्रश्न कधी मिटणार? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

चौकट

नागरिक जागृती मंच आंदोलन करणार

विजयनगर नाल्याचे रूपांतर गटारीत झाले आहे. नाल्यावर छोट्या सिमेंट पाईप टाकून बांधकामे करण्यात आली आहेत.

थोडा पाऊस पडला तरी महापुरासारखी स्थिती होते. स्थानिक नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. तेथील नागरिकांना न्याय द्यावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे.