शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या बदनामीसाठी ‘तासगाव’चा बळी

By admin | Updated: April 17, 2015 00:12 IST

संजयकाका पाटील : हजारवाडीतील कार्यक्रमात माजी मंत्र्यांवर टीका

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना हे पलूस-तासगाव या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विकासाचे मंदिर होते. मात्र माझी बदनामी करून खच्चीकरण करण्यासाठीच जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांनी तासगाव कारखान्याचा बळी घेतला असल्याची तोफ भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी हजारवाडी (ता. पलूस) येथे डागली. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण हा कारखाना चालू करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.भिलवडी व वसगडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याच्या हेतूने हजारवाडी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, गणपती जिल्हा संघाने चांगल्या पध्दतीने कारखाना चालविला होता. उसाला वेळोवेळी योग्य दरही दिला. हे सर्व शेतकरी जाणतात. पण माझे राजकीय वर्चस्व वाढू नये, म्हणून भाडोत्री संघटनांना हाताशी धरून, वेगवेगळ्या माध्यमातून माझी नाहक बदनामी करत माझ्या ताब्यातून कारखाना काढून घेऊन या सहकार मंदिराचा बळी घेतला गेला. या षड्यंत्रात मी संपलो नाही. कारण मी कधीच चुकीचे वागलो नाही, पण सामान्य शेतकरी भरडला जात आहे. कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांकडून ऊस नेताना शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. हा कारखाना परत गणपती जिल्हा संघाच्याच ताब्यात येईल.सरपंच रणजित यादव म्हणाले की, भिलवडी परिसरातील विविध विकासकामे मार्गी लावावीत. हजारवाडीचा केंद्राच्या आदर्श ग्राम योजनेत समावेश करावा. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या भिलवडी रेल्वे स्थानकावर थांबवून दोन्ही तालुक्यातील प्रवाशांची सोय करावी.यावेळी पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, अजित जाधव, अमोल पाटील, वसगडेचे सरपंच अनिल पाटील, रमेश पाटील, खंडोबाचीवाडीचे सरपंच धोंडीराम शिंदे, बुरूंगवाडीचे सरपंच संजय माळी, बबन यादव, सर्जेराव यादव, संजय यादव, बाबूराव तोडकर, महेश जगताप उपस्थित होते. (वार्ताहर)