शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अनास्थेमुळे जत तालुक्याचा बळी

By admin | Updated: October 27, 2015 00:08 IST

जमिनीची प्रतवारी १९२९ नुसारच : दुष्काळातून ७० गावे वगळल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया

गजानन पाटील -- संख -जत तालुक्यातील जमिनीची प्रतवारी निश्चितीसाठी महसूल विभाग आजही इंग्रजकालीन १९२९ च्या नोंदीवर विसंबून आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक तीस वर्षांनी प्रत्येक गावची तपासणी करुन जमिनीची प्रतवारी ठरविली जाते. पण महसूल यंत्रणा ६७ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही बदलायला तयार नाही. भौगोलिक परिस्थिती, हवामान, जमीन, पीक हंगाम एकसारखी असतानासुद्धा आजही महसूल विभाग १९२९ मध्ये केलेल्या जमिनीच्या प्रतवारीनुसार खरीप व रब्बी हंगामाची गावे ठरविली आहेत. त्यानुसार ५३ गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत.खरीप हंगाम वाया गेला अन् प्यायला पाणीही नाही. अशी दुष्काळी परिस्थिती असूनही जाचक सरकारी अटीमुळे ७० गावे दुष्काळातून वगळण्यात आली आहेत. यंदाही दुष्काळी सुविधांपासून तालुक्याचा ऐंशी टक्के भाग वंचित राहणार आहे. सरकारी अनास्थेने होणारी होरपळ दुष्काळापेक्षा तीव्र आहे. महसूल विभागाची सुधारित जमिनीची प्रतवारी कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यामध्ये विस्ताराने सर्वात मोठा असा जत तालुका आहे. महसूल गावांची संख्या १२३ आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २ लाख २४ हजार ८२४ हेक्टर इतके आहे. लागवडीखालील क्षेत्र १ लाख ५८ हजार ७०० हेक्टर आहे. खरीप क्षेत्र ६५ हजार ७०० हेक्टर, रब्बी क्षेत्र ९३ हजार ३०० हेक्टर आहे. मुलकी पड क्षेत्र १ हजार ९७० हेक्टर ७३ हेक्टर आहे. बागायत एकूण क्षेत्र २२ हजार ७५ हेक्टर, जिरायत क्षेत्र ६२ हजार २९९ हेक्टर क्षेत्र आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२७.५ मि. लि., तर प्रमुख पिके ज्वारी, बाजरी, मका व कडधान्ये पिके आहेत. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व हवामान एकसारखे आहे. माळरान, पडीक व डोण भागात काळी, नापीक, कमी प्रतीची जमीन सर्व गावात सारख्याच प्रमाणात आहे. सर्वच गावामध्ये बाजरी, ज्वारी, मका, सूर्यफूल, भूईमूग ही पिके घेतली जातात. सर्वच ठिकाणी खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. विशेषत: खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर दोन्ही हंगामातील पिकांची नोंद केली आहे. पीकपाणी नोंद केलेली असते. दरवर्षी कृषी विभाग तालुक्यातील सर्वच गावातील दोन्ही हंगामांचा पेरणी अहवाल तयार करते; मग कोणत्या निकषावर खरीप व रब्बी हंगामातील गावे ठरविली गेली. याचे ठोस उत्तर महसूल विभागाकडे नाही. हंगामाची गावे कोण ठरवते, याचेही उत्तर नाही. महसूल व कृषी विभाग एकमेकाकडे बोट दाखवित आहेत.शासनाच्या नियमानुसार प्रत्येक तीस वर्षांनी प्रत्येक गावाची तपासणी करुन जमिनीची प्रतवारी जाहीर करावी, असा नियम आहे. परंतु तसे न होता १९२९ मध्ये नोंद झालेल्या प्रतवारीनुसारच खरीप व रब्बी पिकांची तपासणी करून आणेवारी जाहीर केली जाते. आतापर्यंत जमिनीची प्रतवारी करण्यात आलेल्या नाहीत. शासनाच्या दफ्तर दिरंगाईत अडकून पडल्या आहेत.वर्षातून दोनवेळा म्हणजे १५ आॅगस्ट ते २५ सप्टेंबरअखेर खरिपाची व १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर रब्बीची आणेवारी जाहीर केली जाते. पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. प्यायला पाणीही नव्हते. एप्रिल मे महिन्यापासून ५४ गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. परतीच्या मान्सून पावसाने थोड्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे सध्या २४ गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, असे असतानासुद्धा महसूल विभागाने नोंदीच्या निकषानुसार खरीप हंगामातील ५३ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखवून दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. इतर ७० गावातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया जाऊनसुद्धा दुष्काळग्रस्तांमधून वगळली आहेत. तालुक्यातील खरीप हंगामातील ५३ गावांची आणेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत. - प्रमोद गायकवाड, प्रांताधिकारीचुकीच्या नोंदी व जाचक अटींमुळे ७० गावे दुष्काळी सवलतींपासून वंचित राहिली आहेत. महसूल विभागाने फेरसर्वेक्षण करुन दुष्काळी गावामध्ये समावेश करावा, अशी आमची मागणी आहे.- सुशिला व्हनमोरे, जि. प. सदस्याआम्ही तालुक्यातील दोन्ही हंगामातील पेरणी अहवाल तयार करतो. यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. खरीप व रब्बी हंगामाची गावे महसूल विभाग ठरविते. - बाबासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारीटँकरची गावेही वगळलीदुष्काळग्रस्त गावाच्या यादीतून मार्च महिन्यापासून टँकरने पाणीपुरवठा सुरु असलेली बेवनूर, व्हसपेठ, धुळकरवाडी, घोलेश्वर, दरीकोणूर, काराजनगी, खंडनाळ, कुणीकोणूर, सिंगनहळ्ळी, उमराणी, अमृतवाडी, उटगी, माणिकनाळ, अंतराळ, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव ही गावे वगळली आहेत.