शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन; मिरजेत अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 2:29 PM

जेल फोडण्याच्या घटनेचा अखेरचा शिलेदार हरपला

सांगली : स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ क्रांतिकारी व ब्रिटीश काळात सांगलीचा जेल फोडण्याच्या घटनेतील अखेरचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय १0२) यांचे रविवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.कोकणातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवणमध्ये २४ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचठिकाणी त्यांचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर तिसरीसाठी त्यांना वेंगुर्ला तालुक्यातील कोंबुरले येथे त्यांच्या बहिणीकडे पाठविण्यात आले. तिसरीतून त्यांनी शिक्षणाला राम राम केला. त्यानंतर सोनारकाम शिकण्यासाठी ते कोल्हापूरला आले. त्याठिकाणी त्यांनी प्रज्ञापरिषदेत सहभाग घेतला. कोल्हापुरातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कोल्हापुरातच त्यांची व वसंतदादा पाटील यांची ओळख झाली आणि त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन ते सांगलीत आले.कुष्टे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान मोठे आहे. १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनातील ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेला मंत्र मानून सांगलीतील ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकार्य सुरू केले. त्यातील जयराम कुष्टे हे महत्त्वाचे शिलेदार होते. या क्रांतिकार्यामुळे त्यावेळी काही जणांना अटक झाली होती. त्यात वसंतदादा पाटील, हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबुराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेवराव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबुराव पाचोरे, तात्या सोनीकर यांचा समावेश होता. या स्वातंत्र्यसैनिकांनी २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडला होता. यात जयराम कुष्टेही आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व अन्य सहकाºयांसमवेत त्यांनी या थरारक घटनेत पुढाकार घेतला होता.क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. (बापू) लाड, हुतात्मा किसन अहिर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांबरोबर त्यांनी काम केले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने बक्षिस ठेवले होते. बारा वर्षे ते भूमिगत राहिले होते. त्यावेळी ते अकलूज येथे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात वास्तव्यास होते.स्वातंत्र्यानंतर ते सांगलीतच स्थायिक झाले. सामान्य माणसाप्रमाणे ते आयुष्य जगले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.