शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

सत्यापन प्रक्रिया बनली सर्वांचीच डोकेदुखी - स्वस्त धान्य दुकानदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 20:04 IST

स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे.

ठळक मुद्देग्राहकांतूनही नाराजीचा सूर

इस्लामपूर : स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांना शासनाने सत्यापन करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक ही प्रक्रिया २0११ सालापासूनच सुरु आहे. परंतु यातील अनेक जाचक अटी व वारंवार होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे ही प्रक्रिया सर्वांची डोकेदुखी बनली आहे. यामध्ये शासनाने काही बदल करावेत. ही प्रक्रिया गावकामगार तलाठ्यांकडून करुन घ्यावी, अशी मागणी वाळवा तालुका रेशन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बी. देशमुख— कोरे यांनी केली आहे.

 

कोरे म्हणाले, सत्यापन करताना एकाच वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी येणे बंधनकारक आहे. परंतु हे अनेकवेळा शक्य होत नाही. जर शक्य झाले तर सर्व्हर डाऊन असल्याच त्या कुटुबियांना पुन्हा बोलवावे लागते. यामध्ये सर्वांचाच वेळ जातो. पुन्हा पुन्हा सत्यापन प्रक्रियेसाठी येण्यासाठी अनेक कुटुंबिय नकार दर्शवतात. दुकानदारांनी संबंधित कुटुंब प्रमुखाला (शिधापत्रिकेवर महिला कुटुंब प्रमुख आहेत) त्यांना दुकानदाराने सत्यापनासाठी फोन केल्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. तसेच मजुर, लहान मुले, वृध्द यांचे ठसे येत नाहीत. यामुळे ही प्रक्रिया म्हणजे स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांचीही मोठी डोकेदुखी ठरली आहे.

ते म्हणाले, पॉस मशिन वापरातही अनेक त्रुटी आहेत. मशिनमधून कार्डधारकांचा डाटा अचानक एन.पी.एच. मध्ये जातो. तसेच काहींचा डाटा डझनॉट दाखवत असतो. तसेच कुटुंबियांतील काही सदस्यांची नावे दिसतच नाहीत. त्यामुळे युनिटप्रमाणे स्वस्त धान्य देता येत नाही. यामुळेही दुकानदार व ग्राहकांमध्ये तंटे होत आहेत. तसेच दुकानदारांवर फौजदारी गुन्हेही दाखल झाले आहेत. या पॉस मशिनच्या दोषामुळे शासन विनाकारण दुकानदारांना वेठीस धरत आहे, हे चुकीचे आहे.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकानदारांबाबत दि. १३ जून रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये कार्डधारकांना महिन्याच्या शेवटपर्यंत धान्य उपलब्ध करुन देण्याची सक्ती केली आहे. परंतु स्वस्त धान्य दुकाने सुरु झाली तेंव्हापासूनच ही धान्य वितरणाची पध्दती सुरु आहे. अपवाद वगळता सर्वच दुकानदार महिनाभर धान्याचे वितरण करतात आहेत, असेही बाळासाहेब देशमुख— कोरे यांनी स्पष्ट केले.शासनाने १ ते ३१ तारखेपर्यंत स्वस्त धान्य वितरण करण्याची सक्ती दुकानदारांवर केली आहे. परंतु १ तारखेला पॉस मशिन शासनाकडूनच सुरु होत नाही. ५ तारखेनंतरच मशिन सुरु होते. त्यामुळे १ ते ५ तारखेदरम्यान आलेल्या ग्राहकांना धान्य पुरवठा करताना अडचणी येत आहेत.

 

टॅग्स :businessव्यवसायonlineऑनलाइन