शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वसंतदादा कारखाना प्री-कुलिंग, निटिंगची यंत्रणा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:28 IST

सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित माल जास्त काळ सुरक्षित राहावा, यासाठी वसंतदादा कारखान्यामार्फत ‘प्री-कुलिंग’ यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. त्याचबरोबर ...

सांगली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादित माल जास्त काळ सुरक्षित राहावा, यासाठी वसंतदादा कारखान्यामार्फत ‘प्री-कुलिंग’ यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. त्याचबरोबर निटिंग व पॅकिंगची यंत्रणा उभारण्याचा प्रयत्नही केला जाईल. आगामी सभेत त्यावर धोरणात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली.

वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सभा रविवारी ऑनलाईन पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, तसेच कारखान्याचे संचालक उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले की, द्राक्ष, केळी, भाजीपाला यांसारखा नाशवंत माल सहा ते आठ महिने चांगला राहण्यासाठी प्री- कुलिंग सिस्टिम उभारण्याचा विचार आहे. या यंत्रणेमुळे नाशवंत माल एक्स्पोर्ट करून शेतकऱ्यांना मालाची जास्तीत जास्त किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. तसेच शेतीमाल विक्रीसाठी कारखान्यामार्फत यंत्रणा उभी करण्याचाही विचार आहे. शेतीमाल निर्यात करणाऱ्या काही संस्था गावोगावी तयार झाल्या आहेत, पण त्यांना मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याची संधी उपलब्ध हाेत नाही. कारखान्याच्या यंत्रणेच्या माध्यमातून याची सोय केली जाईल. प्री-कुलिंगसह निटिंग व पॅकिंग यंत्रणा उभारण्याबाबत येत्या सभेत निर्णय घेतला जाईल.

ते म्हणाले, आगामी हंगामात १० लाखाहून अधिक गाळप अपेक्षित आहे. जास्त गाळप झाले तर जास्त भाडे उपलब्ध होईल. सभासदांना साखर त्यांच्या भागात उपलब्ध व्हावी, यासाठी दहा महिन्यांची साखर एकाचवेळी सोसायट्यांमधून दिली जाईल. त्यामुळे सभासदांचा वेळ वाचेल. आगामी वर्ष निवडणुकीचे असून मृत सभासदांच्या वारसांनी शेअर्स हस्तांतर करून घ्यावेत. सध्या नवीन शेअर्स विक्री थांबवली असली तरी, सध्या ज्यांच्याकडे शेअर्स आहेत, त्यांना आणखी शेअर्स दिले जातील. तसेच ठेवीच्या रकमेतून शेअर्स देण्याचा निर्णयही घेतला आहे. संचालक अमित पाटील यांनी आभार मानले.

चौकट-

एकरकमी एफआरपी आवश्यक, पण...

विशाल पाटील म्हणाले, शेतकरी म्हणून विचार केला, तर सध्याच्या अडचणी बघता एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. परंतु कारखाना म्हणून विचार करताना, तुकड्यात दिली, तर शेतकऱ्यांना गरजेच्यावेळी उपयोगी पडेल असे वाटते.

चौकट

कंपनीबद्दल दोघांची नाराजी

शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील म्हणाले, कारखाना सभासदांचा असून रूबाब मात्र सध्या भाडेकरूचा दिसून येतो. भाडेकरू असले तरी, सभासदांशी मालक असल्याप्रमाणे कंपनी वागते. सांगलीवाडीचे प्रभाकर पाटील यांनीही, जळीत ऊस घेताना ८०० रुपये कपात केली असल्याची तक्रार केली.