शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

इस्लामपुरातील अवलियाचा स्मशानातून स्वच्छतेचा जागर-समाजप्रबोधनाचे विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:43 IST

जीवनातील स्वार्थ, ईर्षा, स्पर्धा, कपटभाव, द्वेष जेथे क्षणात गळून पडतात, अशी जागा म्हणजे स्मशानभूमी.... मात्र याच स्मशानभूमीकडे अस्वच्छ आणि दुर्गंधीचे ठिकाण म्हणूनही नाके मुरडली जातात. तथापि येथील अहिल्यानगरातील ध्येयवेड्या तरुणाने ‘स्मशानभूमी स्वच्छते’चा वसा हाती घेत २९९ स्मशानभूमींची स्वच्छता करून त्रिशतकी स्वच्छतेकडे

ठळक मुद्देसंडे अँकर । ; ध्येयवेड्या आणि उच्च विद्याविभूषित तांदळेंचे कौतुकास्पद कार्य

युनूस शेख ।इस्लामपूर : जीवनातील स्वार्थ, ईर्षा, स्पर्धा, कपटभाव, द्वेष जेथे क्षणात गळून पडतात, अशी जागा म्हणजे स्मशानभूमी.... मात्र याच स्मशानभूमीकडे अस्वच्छ आणि दुर्गंधीचे ठिकाण म्हणूनही नाके मुरडली जातात. तथापि येथील अहिल्यानगरातील ध्येयवेड्या तरुणाने ‘स्मशानभूमी स्वच्छते’चा वसा हाती घेत २९९ स्मशानभूमींची स्वच्छता करून त्रिशतकी स्वच्छतेकडे वाटचाल सुरू केली आहे. चंद्रशेखर प्रकाश तांदळे असे या ध्येयवेड्या आणि उच्च विद्याविभूषित तरुणाचे नाव आहे.

लोकराज्य विद्या फौंडेशनची स्थापना करण्यापूर्वी चंद्रशेखर तांदळे समाजाच्या अनेक प्रश्नांवर आंदोलने करायचा. मोर्चे, उपोषण हे ठरलेलेच. मात्र धनगर समाज आंदोलनाच्या एका आंदोलनात त्याने अवती-भोवती असणाऱ्या पोलिसांचा डोळा चुकवून दगडाने डोके फोडून घेत या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे जन्म एकदाच मिळतो, पुन्हा पुन्हा मिळत नाही. मिळालेल्या जन्मात समाजासाठी काही तरी चांगले काम करावे, या जाणिवेतून चंद्रशेखरने स्मशानभूमी स्वच्छतेचा संकल्प दोन वर्षांपूर्वी सोडला.

एकवेळ प्रसिद्धीचा स्टंट झाला की असे आरंभशूर आणि त्याचा उपक्रम गायब झाल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र चंद्रशेखरने या सर्वांपेक्षा वेगळे काम करताना, त्यातील टिकवून ठेवलेले सातत्य कौतुकास्पद आहे. स्मशानभूमीकडे बघण्याची मानसिकता ही उपेक्षित नजरेचीच असते. तेथील अस्वच्छता, दुर्गंधी, अंत्यविधीचे इतरत्र पडलेले साहित्य, अर्धवट जळालेली लाकडे, वेली, झाडे-झुडपे असा स्मशानभूमीचा माहोल असतो. आपल्याकडे गटारी, चौक स्वच्छ होतात; मात्र स्मशानभूमी नेहमीच अस्वच्छ असते.

नेमक्या याच अस्वच्छतेचे ‘भूत’ डोक्यात घेऊन चंद्रशेखरने केवळ स्मशानभूमीची स्वच्छता केली नाही, तर त्या पलीकडे जात स्मशानभूमीतच अमावास्येच्या रात्री १२ वाजता रक्तदान, महिलांचे हळदी-कुंकू, सलग १८ तास वाचन, कविसंमेलन, भजन-कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा, महिलांनी वाहिलेल्या प्रतिकात्मक तिरडीला महिलांच्या हातूनच ‘अग्नी’ अशा प्रबोधनात्मक उपक्रमात समाजाच्या डोक्यातील ‘भूत’आणि त्याची आभासी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजामध्ये निर्भिडता, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व वाढीस लावण्याचा प्रयत्न करत असतो.

चंद्रशेखर तांदळे यांनी आपल्या या ११११ स्मशानभूमी स्वच्छता यज्ञाला सीमा ठेवलेली नाही. इस्लामपुरातून सुरुवात केल्यानंतर त्याने नागपूरची दीक्षाभूमी, वर्ध्याच्या सेवाग्रामची बापू कुटी, कºहाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ, अंजनी येथील आर. आर. आबांचे स्मारक, मिरजेचा मीरासाहेब दर्गा, वाटेगावातील अण्णा भाऊंचे स्मारक, शिवाजीराव शेंडगेबापूंचे समाधीस्थळ, महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक, निवासस्थान अशा परिसरातही स्वच्छता केली आहे. 

 

अनेक स्मशानामध्ये अस्वच्छता असल्याचे आढळून येते. येथील स्वच्छता करतांना अन्य तरुणही त्या मोहिमेत सहभागी होतात. या स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचे कौतुक होत असल्याने पुन्हा नवी ऊर्जा मिळते. जिथे स्वच्छता केली, त्या गावातील सामाजिक संस्था, मंडळे स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत. त्यामुळे आपल्या अभियानाची व्याप्ती वाढत असल्याचा अभिमान वाटतो.- चंद्रशेखर तांदळे, इस्लामपूर

टॅग्स :Sangliसांगली