शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत आहे. अतिग्राहकतेतून आलेली वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक आहे, असे प्रतिपादन सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्मिता जांभळी यांनी केले.

पर्यावरण समृद्धी मंच शिराळा- वाळवा आयोजित ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ या ऑनलाईन उपक्रमात ‘पर्यावरण समस्या आणि शाश्वत विकास’ या विषयावर त्या बोलत होत्या. नंदुरबार येथील पर्यावरणतज्ज्ञ प्राचार्य एच. एम. पाटील प्रमुख पाहुणे होते.

प्रा. जांभळी म्हणाल्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचे असमान वितरण, बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता त्यामुळे पृथ्वीची धारण शक्ती कमी होत आहे. वापरा आणि टाकून द्या, या संस्कृतीमुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपले जगणे पर्यावरणपूरक असायला पाहिजे. आपल्या गरजा भागवत असताना पुढील पिढीसाठी नैसर्गिक संसाधने शिल्लक राहणार नसतील, तर आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग पत्करावा लागेल.

प्राचार्य पाटील म्हणाले, आपले गाव, गावातील चांगली माणसे यांनी एकत्रित येऊन स्थानिक पातळीवरील कृती कार्यक्रम करणे आवश्यक आहे.

प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले.

या वेबिनारला मोहन परजने, प्रदीप कुडाळकर, गोदावरी क्षीरसागर, संदीप चोडणकर, सोनाली शिंदे, प्रमोदिनी पाटील उपस्थित होते.