शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: मानवाची बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता यामुळे पृथ्वीची धारण क्षमता कमी होत आहे. अतिग्राहकतेतून आलेली वापरा आणि टाकून द्या संस्कृती पर्यावरणासाठी घातक आहे, असे प्रतिपादन सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. स्मिता जांभळी यांनी केले.

पर्यावरण समृद्धी मंच शिराळा- वाळवा आयोजित ‘पर्यावरणतज्ज्ञ आपल्या भेटीला’ या ऑनलाईन उपक्रमात ‘पर्यावरण समस्या आणि शाश्वत विकास’ या विषयावर त्या बोलत होत्या. नंदुरबार येथील पर्यावरणतज्ज्ञ प्राचार्य एच. एम. पाटील प्रमुख पाहुणे होते.

प्रा. जांभळी म्हणाल्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचे असमान वितरण, बदलती जीवनशैली आणि अतिग्राहकता त्यामुळे पृथ्वीची धारण शक्ती कमी होत आहे. वापरा आणि टाकून द्या, या संस्कृतीमुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आपले जगणे पर्यावरणपूरक असायला पाहिजे. आपल्या गरजा भागवत असताना पुढील पिढीसाठी नैसर्गिक संसाधने शिल्लक राहणार नसतील, तर आपल्याला शाश्वत विकासाचा मार्ग पत्करावा लागेल.

प्राचार्य पाटील म्हणाले, आपले गाव, गावातील चांगली माणसे यांनी एकत्रित येऊन स्थानिक पातळीवरील कृती कार्यक्रम करणे आवश्यक आहे.

प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले.

या वेबिनारला मोहन परजने, प्रदीप कुडाळकर, गोदावरी क्षीरसागर, संदीप चोडणकर, सोनाली शिंदे, प्रमोदिनी पाटील उपस्थित होते.