शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘भू-विकास’चे कर्मचारी करणार अनोखे आंदोलन

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

शासनाला पत्र देणार : आत्महत्येच्या परवानगीची मागणी

सांगली : धुळे येथील भू-विकास बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आत्महत्येच्या परवानगीची मागणी केल्यानंतर, राज्यातील अन्य जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडूनही अशाच पद्धतीची मागणी करण्यात येणार आहे. या अनोख्या मागणीपत्राच्या आंदोलनातून भू-विकास बँकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे कर्मचारी संघटनेमध्ये नाराजी पसरली आहे. ‘भू-विकास’च्या राज्यातील २९ जिल्हा शाखा आणि एक शिखर बँक अस्तित्वात आहे. याशिवाय उपशाखांचीही संख्या मोठी आहे. या बँकांच्या पुनरुज्जीवनाच्या प्रश्नावर नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीने बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जवसुलीतून कर्मचाऱ्यांची देणी देण्याचा व शासकीय नोकरीत त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी, बँका बंद करण्याच्या निर्णयामुळे कर्मचारी संघटनेत नाराजी पसरली आहे. धुळे येथील कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांसह त्रिसदस्यीय समितीला पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी आत्महत्येच्या परवानगीची मागणी केली. विरोधात असताना फडणवीस आमच्यासोबत होेते. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रश्न सुटण्याऐवजी बँका कायमच्या बंद करण्याचा निर्णय होत आहे. थकित पगार, थकित येणी यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे आता भू-विकास बँक कर्मचाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असा उल्लेख या पत्रात आहे. राज्य भू-विकास बँक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील यांनी सांगितले की, या पत्राची प्रत सर्व जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांकडेही गेली आहे. त्यामुळे आता राज्यभरातून अशी पत्रे पाठवून सरकारचे लक्ष वेधणार आहोत. राज्यातील भू-विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना मोबदला मिळणार असला तरी, तो कर्जवसुलीवर अवलंबून आहे. बँका बंद करून मोबदला देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी कधीच केली नाही. याउलट बँकांचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी वारंवार संघटनेने केली आहे. अजूनही याच मुद्यावर संघटनेचा सरकारशी संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हिताची राज्यातील सर्वात महत्त्वाची बँक म्हणून सरकारने याबाबत विचार केला पाहिजे, असे संघटनेचे मत आहे. (प्रतिनिधी)