शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:25 IST

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका ...

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर होत्या.सबनीस म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. मराठी भाषकांवर सुरू असलेल्या अन्यायाबाबत साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला पाहिजे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत तेथे राष्टÑपती शासन लागू करण्यात यावे.ते म्हणाले, समाजात रूंदावणारी धर्म व जातीची दरी नष्ट झाली पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. शेतकरी दुर्लक्षित आहेत. कोणीच त्यांना खºयाअर्थाने न्याय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, स्त्रियांच्या लेखनाचा मूळ पाया लोकवाड़मय आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेविरूध्द तिने आवाज उठविला आहे. लोकसाहित्यातून स्त्रीने स्वातंत्र्य मागण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य व स्त्रीसाहित्य असा भेद न करता, समाजाच्या वेदना व समकालीन प्रश्नांना वाचा फोडणाºया लोकसाहित्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. ‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात डॉ. राजेंद्र कुंभार व प्रा. अविनाश सप्रे सहभागी होते. गुरव म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. समोर जळतंय, त्यावर लेखकाचे मत महत्त्वाचे आहे. वादाच्यावेळी कलावंत व लेखक हा सामान्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. कोणाला तरी चांगले वाटण्यासाठी लिहिण्यापेक्षा सत्ताधाºयांशी संघर्ष करणारा सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, सामाजिक गरजेतून अभिव्यक्ती निर्माण होते. स्वातंत्र्य कशासाठी, हे ओळखले पाहिजे. लोकप्रिय लेखनापेक्षा समाज ढवळणाºया व प्रक्षोभ निर्माण करणाºया साहित्यातून समाजपरिवर्तन होईल.डॉ. कुंभार म्हणाले, लिहिण्याचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा आहे. कोरेगाव-भीमा संघर्ष, शेतकºयांच्या समस्या साहित्यातून उमटल्या पाहिजेत.धनदत्त बोरगावे यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सीमाभागातील कवी सहभागी होते. ‘मोक्ष’ हे सांगली विभागीय राज्य नाट्य स्पर्धेतील परितोषिक प्राप्त नाटक सादर करण्यात आले. प्रतिभा जगदाळे, (चंदनवृक्ष), अरुण इंगवले (अबूट घेºयातील सूर्य), आप्पासाहेब पाटील, (तडजोड) आणि डॉ. व्ही. एन. शिंदे (एककांचे मानकरी) यांना श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते चैतन्य शब्दांगण साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, संस्थापक, अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्रा. वैजनाथ महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष गणेश माळी यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले. शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी आभार मानले. साहित्य व नाट्यरसिकांचा संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला.