शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:25 IST

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका ...

मिरज : सीमाभागातील मराठी भाषिकांची गळचेपी सुरू आहे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केली.चिमण लोकूर साहित्य नगरी (बालगंधर्व नाट्यगृह) येथे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभा व चैतन्य शब्दांगण साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर होत्या.सबनीस म्हणाले, कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना मोठ्या यातना भोगाव्या लागत आहेत. मराठी भाषकांवर सुरू असलेल्या अन्यायाबाबत साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून आवाज उठविला पाहिजे. सीमावादाचा निर्णय होईपर्यंत तेथे राष्टÑपती शासन लागू करण्यात यावे.ते म्हणाले, समाजात रूंदावणारी धर्म व जातीची दरी नष्ट झाली पाहिजे. स्त्रियांचे प्रश्न साहित्यापुरतेच मर्यादित आहेत. शेतकरी दुर्लक्षित आहेत. कोणीच त्यांना खºयाअर्थाने न्याय दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून साहित्य निर्मिती केली पाहिजे.डॉ. भवाळकर म्हणाल्या, स्त्रियांच्या लेखनाचा मूळ पाया लोकवाड़मय आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेविरूध्द तिने आवाज उठविला आहे. लोकसाहित्यातून स्त्रीने स्वातंत्र्य मागण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य व स्त्रीसाहित्य असा भेद न करता, समाजाच्या वेदना व समकालीन प्रश्नांना वाचा फोडणाºया लोकसाहित्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. ‘अभिव्यक्ती व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर डॉ. बाबूराव गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या परिसंवादात डॉ. राजेंद्र कुंभार व प्रा. अविनाश सप्रे सहभागी होते. गुरव म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य झगडून मिळवावे लागते. समोर जळतंय, त्यावर लेखकाचे मत महत्त्वाचे आहे. वादाच्यावेळी कलावंत व लेखक हा सामान्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. कोणाला तरी चांगले वाटण्यासाठी लिहिण्यापेक्षा सत्ताधाºयांशी संघर्ष करणारा सामान्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, सामाजिक गरजेतून अभिव्यक्ती निर्माण होते. स्वातंत्र्य कशासाठी, हे ओळखले पाहिजे. लोकप्रिय लेखनापेक्षा समाज ढवळणाºया व प्रक्षोभ निर्माण करणाºया साहित्यातून समाजपरिवर्तन होईल.डॉ. कुंभार म्हणाले, लिहिण्याचा अधिकार जगण्याच्या अधिकारापेक्षा मोठा आहे. कोरेगाव-भीमा संघर्ष, शेतकºयांच्या समस्या साहित्यातून उमटल्या पाहिजेत.धनदत्त बोरगावे यांच्या अध्यक्षतेखालील कविसंमेलनात सांगली, कोल्हापूर, सोलापूर व सीमाभागातील कवी सहभागी होते. ‘मोक्ष’ हे सांगली विभागीय राज्य नाट्य स्पर्धेतील परितोषिक प्राप्त नाटक सादर करण्यात आले. प्रतिभा जगदाळे, (चंदनवृक्ष), अरुण इंगवले (अबूट घेºयातील सूर्य), आप्पासाहेब पाटील, (तडजोड) आणि डॉ. व्ही. एन. शिंदे (एककांचे मानकरी) यांना श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते चैतन्य शब्दांगण साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे, संस्थापक, अध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, प्रा. वैजनाथ महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष गणेश माळी यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्टÑ साहित्य सभेचे उपाध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी प्रास्ताविक केले. शब्दांगण संस्थेचे अध्यक्ष नामदेव भोसले यांनी आभार मानले. साहित्य व नाट्यरसिकांचा संमेलनास चांगला प्रतिसाद मिळाला.