शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने ...

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. २०१५चा शासन निर्णय रद्द करून २०१९च्या धर्तीवर विनाअट संपूर्ण कर्जमाफी घेण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, पूरस्थितीची पाहणी करताना, उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज देणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय शासन निर्णयात नाही. पूर ओसरून महिना झाला, तरी सरकार काय करत आहे, हे कळत नाही.

ते म्हणाले, मागील सरकारला शेतीमधील काही कळत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, त्यांनी हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत दिली होती. या सरकारने सोयाबीनला गुंठ्याला ६८ आणि उसाला १३५ रुपये देऊन शेतकऱ्यांची घोर थट्टा केली आहे.

शिवाजीराव नाईक म्हणाले, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या मदतीतून वैरणीचा खर्चही निघणार नाही. निशिकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मंगळवारच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.

यावेळी महेश खराडे, ॲड.एस.यू. संदे, विजय पवार, संदीप राजोबा, शाकीर तांबोळी, सनी खराडे, पोपटराव मोरे, धनाजी गावडे, अप्पासाहेब कांबळे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

चौकट

मंगळवारी मोर्चा..

शेट्टी म्हणाले, मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कचेरीजवळून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात वाळवा-शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तेथे जाहीर सभा होईल.