शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विनाअट कर्जमाफी घेणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने ...

इस्लामपूर : महापूर उलटून एक महिना संपत आला, तरी पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना सरकारची कसलीही मदत मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. २०१५चा शासन निर्णय रद्द करून २०१९च्या धर्तीवर विनाअट संपूर्ण कर्जमाफी घेण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, पूरस्थितीची पाहणी करताना, उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज देणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे, असे म्हटल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याचा विषय शासन निर्णयात नाही. पूर ओसरून महिना झाला, तरी सरकार काय करत आहे, हे कळत नाही.

ते म्हणाले, मागील सरकारला शेतीमधील काही कळत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, त्यांनी हेक्टरी ३८ हजार रुपयांची मदत दिली होती. या सरकारने सोयाबीनला गुंठ्याला ६८ आणि उसाला १३५ रुपये देऊन शेतकऱ्यांची घोर थट्टा केली आहे.

शिवाजीराव नाईक म्हणाले, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या मदतीतून वैरणीचा खर्चही निघणार नाही. निशिकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मंगळवारच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.

यावेळी महेश खराडे, ॲड.एस.यू. संदे, विजय पवार, संदीप राजोबा, शाकीर तांबोळी, सनी खराडे, पोपटराव मोरे, धनाजी गावडे, अप्पासाहेब कांबळे, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

चौकट

मंगळवारी मोर्चा..

शेट्टी म्हणाले, मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कचेरीजवळून या आक्रोश मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात वाळवा-शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर जाणार आहे. तेथे जाहीर सभा होईल.