शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

दोन वर्षात जिल्हा बेघरमुक्त करा

By admin | Updated: May 19, 2017 23:45 IST

दोन वर्षात जिल्हा बेघरमुक्त करा

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात साडेसहा हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. यातील ४० टक्के नागरिकांना निधीचा पहिला हप्ताही मिळाला आहे. बेसलाईन सर्व्हेप्रमाणे सांगली जिल्ह्यात अद्याप १५ हजार नागरिक बेघर आहेत. ही एक चांगली संधी मानून आगामी दोन वर्षात १५ हजार घरकुले बांधावीत. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व अन्य मागासवर्गीय लोकांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.मिरज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, शासनाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. शाश्वत पाण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सूक्ष्म नियोजन करा व येत्या तीन ते चार महिन्यात ते प्रत्यक्षात उतरवा. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या १६५ मेगावॅट वीज लागते. ही योजना राज्यातील पहिली सौरऊर्जाचलित उपसा सिंचन योजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीेस यांनीे घनकचरा विलगीकरण व व्यवस्थापन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पोलिस विभागाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनेला केलेल्या मदतीच्या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह अधिकारी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.स्वच्छता अभियानाचे कौतुक स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात जवळपास ७० हजार शौचालयांपेक्षा अधिक शौचालये बांधणीचे काम झाले आहे. हा एक प्रकारे विक्रमच आहे. स्वच्छतेमध्ये चांगले काम केलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेने केवळ हागणदारीमुक्तीवरच न थांबता स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.